शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

नळपाणी योजनांची दुरुस्ती आचारसंहितेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:53 IST

टंचाईकृती आराखड्यातील १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्च करुन दुरुस्त करण्यात येणाºया २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे या कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी मागणी करुन

रत्नागिरी : टंचाईकृती आराखड्यातील १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्च करुन दुरुस्त करण्यात येणाºया २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे या कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी मागणी करुनही त्याला कोणतेही उत्तर न मिळाल्याने पाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीची कामे ऐन टंचाईच्या कालावधीत सुरु झालेली नाहीत. 

नादुरुस्त झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत असले तरी ही दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजना दुरुस्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यंदाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये त्यासाठी निधीची मागणी केली होती़ जिल्हा प्रशासनाने २२२ नळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले आहेत़ 

या योजनांचा विस्तार १५३ गावातील ३०६ वाड्यांमध्ये झालेला आहे. या योजनांच्या नादुरुस्तीचा परिणाम लाखो लोकांना करण्यात येणाºया पाणी पुरवठ्यावर होतो़ उन्हाळ्याच्या दिवसांत तर या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते़ त्यासाठी या योजना टंचाई कृती आराखड्यामध्ये दुरुस्तीची कामे घेण्यात आलेल्या होत्या. या नळपाणी योजना  लवकरच दुरुस्त होऊन त्याचा फायदा  टंचाईच्या कालावधीत होणार होता.  

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने ही कामे करण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे निविदा काढून पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्याची परवानगीसाठी मागितली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत काहीही कळविले नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई सुरु झाली असली तरी जिल्हा परिषदेकडून ही दुरुस्तीची कामे हाती घेतलेली नाहीत. त्यामुळे ही कामे अडकली आहेत. 

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीWaterपाणी