शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नळपाणी योजनांची दुरुस्ती आचारसंहितेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:53 IST

टंचाईकृती आराखड्यातील १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्च करुन दुरुस्त करण्यात येणाºया २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे या कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी मागणी करुन

रत्नागिरी : टंचाईकृती आराखड्यातील १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्च करुन दुरुस्त करण्यात येणाºया २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे या कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी मागणी करुनही त्याला कोणतेही उत्तर न मिळाल्याने पाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीची कामे ऐन टंचाईच्या कालावधीत सुरु झालेली नाहीत. 

नादुरुस्त झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत असले तरी ही दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजना दुरुस्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यंदाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये त्यासाठी निधीची मागणी केली होती़ जिल्हा प्रशासनाने २२२ नळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले आहेत़ 

या योजनांचा विस्तार १५३ गावातील ३०६ वाड्यांमध्ये झालेला आहे. या योजनांच्या नादुरुस्तीचा परिणाम लाखो लोकांना करण्यात येणाºया पाणी पुरवठ्यावर होतो़ उन्हाळ्याच्या दिवसांत तर या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते़ त्यासाठी या योजना टंचाई कृती आराखड्यामध्ये दुरुस्तीची कामे घेण्यात आलेल्या होत्या. या नळपाणी योजना  लवकरच दुरुस्त होऊन त्याचा फायदा  टंचाईच्या कालावधीत होणार होता.  

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने ही कामे करण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे निविदा काढून पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्याची परवानगीसाठी मागितली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत काहीही कळविले नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई सुरु झाली असली तरी जिल्हा परिषदेकडून ही दुरुस्तीची कामे हाती घेतलेली नाहीत. त्यामुळे ही कामे अडकली आहेत. 

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीWaterपाणी