शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Ratnagiri: आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग सात वर्षे रखडलेलाच, केंद्र शासनाच्या संसद ग्राम योजनेतून काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:56 IST

मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे - राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण ...

मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे - राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न तालुकावासीयांना पडला प्रश्न आहे.२०१६ साली सुरू झालेल्या आंबडवे - लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे साठ किमी अंतरात मार्गाचे नूतनीकरण रुंदीकरणाबरोबर काँक्रिटीकरण होत आहे. खूप विलंब होत असलेल्या या मार्गाचे काम सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पाच्या नूतनीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंका नाही. पर्यटनाबरोबर, दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने मार्गाचे काम गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे व त्यासाठी तालुकावासीय आग्रही आहेत.गेल्या सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारित असतानाही रखडलेला आहे. देशभरात रस्त्याची कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना मंडणगडच्या पदरी मात्र नेहमीप्रमाणे निराशा पडली आहे. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा असताना आठ वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या महामार्गामुळे निर्माण केलेल्या समस्यांना ग्रामस्थ आठ वर्षे सामोरे जात आहेत.मार्ग तयार होत असताना अनेक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे, चढ-उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आली आहेत. हा महामार्ग बनवताना भविष्याचा विचार करण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या बाजूने उभी करण्यात आलेली गटारे भविष्यकाळात कळीचा मुद्दा ठरतील की काय, अशीही शंका निर्माण होते. यातील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे, याचे उत्तर मिळालेले नाही. काम सुरू असलेल्या लगतच्या अनेक गावातील परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

गाड्या उडतात हवेततुळशी येथे पावसात खचलेला काँक्रीट रस्ता अद्याप दुरुस्त न केल्याने गाड्या हवेत उडून जोरात आदळण्याचे प्रकार घडत आहेत. यात प्रवाशांना गंभीर मार बसत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकार