शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Ratnagiri: आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग सात वर्षे रखडलेलाच, केंद्र शासनाच्या संसद ग्राम योजनेतून काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:56 IST

मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे - राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण ...

मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे - राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न तालुकावासीयांना पडला प्रश्न आहे.२०१६ साली सुरू झालेल्या आंबडवे - लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे साठ किमी अंतरात मार्गाचे नूतनीकरण रुंदीकरणाबरोबर काँक्रिटीकरण होत आहे. खूप विलंब होत असलेल्या या मार्गाचे काम सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पाच्या नूतनीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंका नाही. पर्यटनाबरोबर, दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने मार्गाचे काम गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे व त्यासाठी तालुकावासीय आग्रही आहेत.गेल्या सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारित असतानाही रखडलेला आहे. देशभरात रस्त्याची कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना मंडणगडच्या पदरी मात्र नेहमीप्रमाणे निराशा पडली आहे. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा असताना आठ वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या महामार्गामुळे निर्माण केलेल्या समस्यांना ग्रामस्थ आठ वर्षे सामोरे जात आहेत.मार्ग तयार होत असताना अनेक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे, चढ-उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आली आहेत. हा महामार्ग बनवताना भविष्याचा विचार करण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या बाजूने उभी करण्यात आलेली गटारे भविष्यकाळात कळीचा मुद्दा ठरतील की काय, अशीही शंका निर्माण होते. यातील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे, याचे उत्तर मिळालेले नाही. काम सुरू असलेल्या लगतच्या अनेक गावातील परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

गाड्या उडतात हवेततुळशी येथे पावसात खचलेला काँक्रीट रस्ता अद्याप दुरुस्त न केल्याने गाड्या हवेत उडून जोरात आदळण्याचे प्रकार घडत आहेत. यात प्रवाशांना गंभीर मार बसत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकार