शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

वित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:38 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरील व्याज आणि तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे सुमारे एक कोटी रुपये परत करावे लागणार आहेत़ गावच्या विकासाचा निधी परत जाणार असतानाच व्याजाची रक्कमही शासनाने परत घेतल्याने ग्रामपंचायतींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़.

ठळक मुद्देवित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळचौदाव्या वित्त आयोगाचा निधीही परत मागितला

रत्नागिरी : चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरील व्याज आणि तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे सुमारे एक कोटी रुपये परत करावे लागणार आहेत़ गावच्या विकासाचा निधी परत जाणार असतानाच व्याजाची रक्कमही शासनाने परत घेतल्याने ग्रामपंचायतींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़.कोरोनामुळे शासनाच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे़ त्यामुळे शासन आर्थिक अडचणीत सापडले असल्याने तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगातून शासनाकडून निधी दिला जातो़ त्यासाठी प्रत्येक गावचा आराखडा तयार करून तो जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सादर करण्यात येतो़शासनाने यावर्षी गावागावात कोरोना प्रतिबंधासाठी होमिओपॅथिक औषधे वाटण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना आदेश काढले आहेत़ या औषधांच्या खरेदीसाठी ग्रामपंचायतस्तरावर शिल्लक असलेला तेराव्या वित्त आयोगातील अखर्चित निधी आणि चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचे व्याज सरकारने जमा करण्याचे आदेश दिले होते़ हा निधी शासनाच्या खात्यावर ग्रामपंचायतींना जमा करावा लागणार आहे़या आदेशाबाबतची सूचना पंचायत समिती गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. आर्थिक दृष्ट्या आधीच गरीब असलेल्या ग्रामपंचायतींकडे निधी परत मागण्यात आल्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होणारा गावचा विकास रखडणार आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे़

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी