शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या : आशिष खातू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST

चिपळूण : तौक्ते वादळानंतर आता १५ दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. कोकणात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बेगमीची जुळवाजुळव करावी लागते. ही ...

चिपळूण : तौक्ते वादळानंतर आता १५ दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. कोकणात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बेगमीची जुळवाजुळव करावी लागते. ही बाब लक्षात घेता शासन व जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना नियम व अटीअंतर्गत व्यवसाय सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक आशिष खातू यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

याबाबत खातू यांनी शासनाकडे विनंती करताना, गेले वर्षभर संसर्गकाळात लॉकडाऊनमुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. गतवर्षी सुमारे सहा महिन्यांचा व्यवसायाचा हंगाम लॉकडाऊनमध्ये गेला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये झाला असल्याने पुन्हा लॉकडाऊनची शक्यता आहे. त्यापेक्षा व्यापाऱ्यांना सवलत दिल्यास काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यापारी घेऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने व्यापारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी व्यवसाय सुरू करण्याबाबत सवलत द्यावी.

व्यवसाय सुरू करताना संबंधित व्यापाऱ्यांवर काटेकोर संसर्ग संदर्भातील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात यावेत. तसेच सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत एक दिवसआड असे आठवड्यातून तीन दिवस व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी. तसेच उर्वरित दोन दिवस अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सुविधा वगळता, सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे नियोजन केल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच संसर्ग प्रसार रोखण्यासाठी नियोजन होऊ शकते, अशी विनंती खातू यांनी केली आहे.