शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कुणाच्याही डरकाळीला घाबरत नाही; राजन साळवींच्या विधानावर मंत्री उदय सामंतांचे प्रत्त्युत्तर

By मनोज मुळ्ये | Updated: July 18, 2024 18:28 IST

वाटूळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरुन आरोप-प्रत्यारोप

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे प्रस्तावित असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरुन सुरू झालेले आरोप प्रत्यारोप अजूनही थांबलेले नाहीत. आपल्या एका डरकाळीमुळे काम झाल्याचे विधान आमदार राजन साळवी यांनी केले होते. आता त्या विधानाला पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. कुणाच्याही डरकाळीला मी घाबरत नाही, असे सांगतानाच नुसते बॅनर लावून विकास होत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.गुरुवारी राजापूर दौ-यावर असलेल्या मंत्री सामंत यांच्याहस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलेच चचिमटे काढले. राजापूर विधानसभा मतदार संघात नवीन फॅशन सुरु झाली आहे. आम्ही विकासकामे करायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी बॅनर लावून श्रेय घयायचे. पण नुसते बॅनर लावून विकास होत नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.राजापूरच्या मतदार संघाला ऐतिहासिक वारसा आहे ते जपण्याचे काम भविष्यात याच मतदार संघात होणार होईल, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकांकडेच इशारा केला आहे. वाटुळ येथे होऊ घातलेल्या सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सिंधूरत्न समितीचे महाराष्ट्राचे सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला. मात्र डरकाळी फोडून श्रेय घेण्याचे काम येथील काही लोकप्रतिनिधी करत आहेत. अशा डरकाळीला उदय सामंत घाबरत नाही आणि कोणाच्या टिकेला बोलून उत्तर देत नाही. मी जनतेची सेवा करून त्यांची कामे करून विरोधकांना उत्तर देतो.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीUday Samantउदय सामंत