शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कुणाच्याही डरकाळीला घाबरत नाही; राजन साळवींच्या विधानावर मंत्री उदय सामंतांचे प्रत्त्युत्तर

By मनोज मुळ्ये | Updated: July 18, 2024 18:28 IST

वाटूळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरुन आरोप-प्रत्यारोप

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे प्रस्तावित असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरुन सुरू झालेले आरोप प्रत्यारोप अजूनही थांबलेले नाहीत. आपल्या एका डरकाळीमुळे काम झाल्याचे विधान आमदार राजन साळवी यांनी केले होते. आता त्या विधानाला पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. कुणाच्याही डरकाळीला मी घाबरत नाही, असे सांगतानाच नुसते बॅनर लावून विकास होत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.गुरुवारी राजापूर दौ-यावर असलेल्या मंत्री सामंत यांच्याहस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलेच चचिमटे काढले. राजापूर विधानसभा मतदार संघात नवीन फॅशन सुरु झाली आहे. आम्ही विकासकामे करायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी बॅनर लावून श्रेय घयायचे. पण नुसते बॅनर लावून विकास होत नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.राजापूरच्या मतदार संघाला ऐतिहासिक वारसा आहे ते जपण्याचे काम भविष्यात याच मतदार संघात होणार होईल, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकांकडेच इशारा केला आहे. वाटुळ येथे होऊ घातलेल्या सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सिंधूरत्न समितीचे महाराष्ट्राचे सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला. मात्र डरकाळी फोडून श्रेय घेण्याचे काम येथील काही लोकप्रतिनिधी करत आहेत. अशा डरकाळीला उदय सामंत घाबरत नाही आणि कोणाच्या टिकेला बोलून उत्तर देत नाही. मी जनतेची सेवा करून त्यांची कामे करून विरोधकांना उत्तर देतो.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीUday Samantउदय सामंत