शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत आॅलिव्ह रिडले'च्या पिल्लांना जीवदान, अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:57 IST

वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले.

ठळक मुद्देकासवमित्र, वन खात्याच्या माध्यमातून अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू

रत्नागिरी : वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले.नोव्हेंबर ते फेबु्वारी या कालावधीत अनेक कासवे रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर अंधारात अंडी घालण्यासाठी येत असतात. कासवमित्र व वन खात्याच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्त घालून, कासवाने घातलेली अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू झाले.

ही अंडी पुढील ५० दिवस समुद्रकिनारी नेटने बांधलेल्या जाळ्यांमध्ये खड्डा काढून ठेवल्यानंतर जन्माला येणाऱ्या पिल्लांना समुद्रात सोडून देण्यात येते. विभागीय वन अधिकारी विकास जगताप, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील, सुधीर रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लांना समुद्रकिनाऱ्यांवर सोडण्यात आले.५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतातकासव समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालून ती वाळूने झाकून निघून जाते. त्यानंतर खुणांवरून अंड्यांचा शोध घेतला जातो. ही अंडी समुद्रकिनारी तयार केलेल्या उबवणीगृहात ठेवली जातात. साधारण ५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. त्यांना समुद्रकिनारी २० ते २५ फुटांवर सोडण्यात येते.

त्यानंतर ही पिल्ले पाण्यात झेपावतात. मच्छीमारी, समुद्री जीव व अन्य श्वापदे या सगळ्यातून कासव जगण्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यासाठी त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीenvironmentवातावरण