शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

रत्नागिरीत आॅलिव्ह रिडले'च्या पिल्लांना जीवदान, अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:57 IST

वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले.

ठळक मुद्देकासवमित्र, वन खात्याच्या माध्यमातून अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू

रत्नागिरी : वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले.नोव्हेंबर ते फेबु्वारी या कालावधीत अनेक कासवे रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर अंधारात अंडी घालण्यासाठी येत असतात. कासवमित्र व वन खात्याच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्त घालून, कासवाने घातलेली अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू झाले.

ही अंडी पुढील ५० दिवस समुद्रकिनारी नेटने बांधलेल्या जाळ्यांमध्ये खड्डा काढून ठेवल्यानंतर जन्माला येणाऱ्या पिल्लांना समुद्रात सोडून देण्यात येते. विभागीय वन अधिकारी विकास जगताप, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील, सुधीर रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लांना समुद्रकिनाऱ्यांवर सोडण्यात आले.५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतातकासव समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालून ती वाळूने झाकून निघून जाते. त्यानंतर खुणांवरून अंड्यांचा शोध घेतला जातो. ही अंडी समुद्रकिनारी तयार केलेल्या उबवणीगृहात ठेवली जातात. साधारण ५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. त्यांना समुद्रकिनारी २० ते २५ फुटांवर सोडण्यात येते.

त्यानंतर ही पिल्ले पाण्यात झेपावतात. मच्छीमारी, समुद्री जीव व अन्य श्वापदे या सगळ्यातून कासव जगण्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यासाठी त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीenvironmentवातावरण