शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

..पुन्हा पुन्हा उकळी का देता, यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 1:33 PM

ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची, आम्ही त्याला उत्तर द्यायचे यातून काय साध्य होणार आहे. राज्यातील जनता काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विचारला.

खेड : महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सरकार चालवत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याला साथ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेब थोरात आणि त्यांचा काँग्रेस पक्ष करत आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड येथे व्यक्त केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच सरकार चालवत आहे, असा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी आम्ही सगळे सरकार चालवत असल्याचे सांगितले. खेड येथील रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. २८ मार्च) खेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठकही घेतली. या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.बरेचजण आपल्या आईला मातोश्री म्हणतातयावेळी यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण केले. ते म्हणाले की, एजन्सी ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करते. यशवंत जाधव यांनीच उत्तर दिले आहे की, मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो. बरेचजण आपल्या आईला मातोश्री म्हणतात. काहीजण आई म्हणतात, तर काहीजण मातोश्री म्हणतात. ते स्वत:च म्हणतात, मग त्याला पुन्हा पुन्हा अधिक उकळी का देता, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.ज्यांना उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतातआमदार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेलाही, उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ज्यांना कोणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात. असल्या गोष्टीला जास्तीचे महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद झाला पाहिजे की, इथे येऊन आज इतके झटझट निर्णय घेतले आहेत. तीन ते चार सचिवांशी बोलून सूचना दिलेल्या आहेत. त्याला महत्त्व देऊ, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

यातून काय साध्य होणार

ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची, आम्ही त्याला उत्तर द्यायचे यातून काय साध्य होणार आहे. राज्यातील जनता काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विचारला.ज्याचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, अशा विधानांना आम्ही उत्तर देऊ, त्यांच्या विधानाला फार महत्त्व देण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले. '

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAjit Pawarअजित पवारYashwant Jadhavयशवंत जाधव