शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
5
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
6
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
8
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
9
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
10
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
11
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
12
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
13
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
14
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
15
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
16
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
17
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
18
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
19
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
20
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...

"अहो किती हा निर्लज्जपणा, विश्वासघातकी अन् गद्दारांमध्ये फरक असतो का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:55 IST

आदित्य यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत निशाणा साधला. 

मुंबई - शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज रत्नागिरीतून सुरुवात झाली. आदित्य यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीत ठिकठिकाणी बॅनर झळकले असून, यातील एक बॅनर चर्चेचा विषय ठरला. सध्या गाजत असलेल्य स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुकांत सावंत यांचा फोटो या बॅनरवर असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यावरुन, खासदार विनायक राऊत यांनी भूमिका मांडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. आदित्य यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत निशाणा साधला. 

जे झालं ते झालं, जी गद्दारी झाली ती झाली. आजची गर्दी पाहून एवढच सांगू इच्छितो की येथे शिवसेनाचा जिंकून येणार. मला आज याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला दिसून येत आहेत, म्हणजे येथील महिला भगिनींनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, असे म्हणत आदित्य यांनी भाषणाची सुरुवात केली. तसेच, माझा हा कोकणातील दुसरा दौरा असून यापूर्वीही मी कोकण दौरा केला. निष्ठा यात्रेत, शिवसंवाद यात्रेतून मी कोकणात आलो होते. त्यावेळी, या गद्दारांचा मला मेसेज यायचा, मला निरोप यायचा की. आम्हाला विश्वासघातकी म्हणा पण गद्दार म्हणू नका, अहो किती हा निर्लज्जपणा... अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी आणि बंडखोरांवर तोफ डागली.  

विधानसभेच्या पायऱ्यावर आम्ही ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणा देत होतो. त्यावेळी, हे बंडखोर आम्हाला उत्तर देताना म्हणायचे. तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का? म्हणजे त्यांनी खोके घेतले हे मान्यच केलं. देशाच्या इतिहासात ७५ वर्षांत एवढा निर्लज्जपणा पाहिलात का, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, ५० खोके एकमद ओके ही घोषणाबाजीही केली. त्यांनी आदित्य ठाकरे ५० खोके.... असं म्हणायचे आणि एकदम ओके... अशा घोषणा उपस्थित लोकं देत होते. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुनही सरकारवर जोरदार निशाणा साधला.  शिवसेनेतील बंडाळीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्यानिमित्ताने रत्नागिरीत १६ सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर झळकले. ज्याठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे, त्याचठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भले मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, यातील एका बॅनरमुळे शहरात एकच चर्चा रंगू लागली, त्यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRatnagiriरत्नागिरी