शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

शिक्षणात पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:00 PM

संपूर्ण भारतातील पहिला प्रयाेग

दापोली (रत्नागिरी) : कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यवहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. खरंतर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार असल्याची घाेषणा राज्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प-संस्थात्मक विकास योजना आयोजित ‘आधुनिक कृषी शिक्षणाची संधी : भविष्याची उज्ज्वल नांदी’ या विषयावरील कार्यशाळेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मंत्री केसरकर बाेलत हाेते.यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डाॅ. संजय भावे, कार्यकारी परिषद सदस्य संदीप राजपुरे, सुनील दळवी, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ अभियंता निनाद कुळकर्णी, स्वीय सहायक जितेंद्र काळेपाटील, डॉ. अतुल मोहोड, डॉ. संतोष सावर्डेकर, डॉ. विनायक पाटील, दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, कोकण कृषी विद्यापीठाने विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. कोकणातील पाणीटंचाईवर विद्यापीठाने कोकण विजय बंधारा विकसित केला आहे. त्याबरोबरच टायर बंधारे प्रात्यक्षिके आयोजित करावीत. भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून, चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

संपूर्ण भारतातील पहिला प्रयाेगहा कृषी शिक्षण महोत्सव संपूर्ण भारतातील २२ कृषी विद्यापीठांच्या योजनेंतर्गत प्रथमच दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे, असे काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय भावे यांनी सांगितले.

शिक्षकांना कृषी प्रशिक्षण देणारराज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या-त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर कृषीचे प्रशिक्षण घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कृषीचे शिक्षण देणार आहेत. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDipak Kesarkarदीपक केसरकरAgriculture Sectorशेती क्षेत्रEducationशिक्षण