शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस लाभ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

By अरुण आडिवरेकर | Updated: December 14, 2022 18:48 IST

दापोलीत ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक

दापोली : विद्यापीठात झालेले संशोधन कार्य अत्यंत मोलाचे असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसोबत जीवनस्तर उंचाविण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अपर मुख्य सचिव (कृषी) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षक व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू, डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इन्द्रमणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित होते.चारही कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात त्या- त्या विद्यापीठातील संशोधन अवजारे बी बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली.यानिमित्त दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात चारही कृषी विद्यापीठाचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले. कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत असल्याचे यावेळी ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapodiदापोडीagricultureशेतीAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी