शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सत्तार म्हणाले, "आता पदवी मिळाली; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत," चूक लक्षात येताच सावरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:33 IST

विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. त्यावेळी सत्तार उपस्थित होते.

रत्नागिरी : आता पदवी मिळाली आहे; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, असे विधान विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, आपली काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढे लगेचच सावरून घेत राज्य सरकार आता ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. त्यात सर्वांना नोकरी मिळेल, असे सांगितले. मात्र, त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. प्र-कुलपती व कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इम्फाळ येथील कुलपती व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन, रत्नागिरीचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच आमदार योगेश कदम, कुलसचिव डॉ. भरत साळवी व्यासपीठावर उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी शरद पवार हेही यावेळी उपस्थित होते.

देशात शहरीकरणाचा जोर वाढत असला तरी शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे, येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील, असे राज्यपालांनी सांगितले. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादनांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे, असेही सत्तार म्हणाले.

राज्यपालांकडूनही मार्गदर्शनया समारंभात ३४ पीएच. डी., १०५ पदव्युत्तर पदवी आणि २१०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले.

जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे, असे डॉ. एस. अय्यपन यांनी यावेळी सांगितले. कृषी विद्यापीठांमधील सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. पदवीदान सोहळ्यापूर्वी राज्यपाल बैस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरी