शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सत्तार म्हणाले, "आता पदवी मिळाली; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत," चूक लक्षात येताच सावरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:33 IST

विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. त्यावेळी सत्तार उपस्थित होते.

रत्नागिरी : आता पदवी मिळाली आहे; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, असे विधान विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, आपली काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढे लगेचच सावरून घेत राज्य सरकार आता ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. त्यात सर्वांना नोकरी मिळेल, असे सांगितले. मात्र, त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. प्र-कुलपती व कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इम्फाळ येथील कुलपती व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन, रत्नागिरीचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच आमदार योगेश कदम, कुलसचिव डॉ. भरत साळवी व्यासपीठावर उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी शरद पवार हेही यावेळी उपस्थित होते.

देशात शहरीकरणाचा जोर वाढत असला तरी शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे, येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील, असे राज्यपालांनी सांगितले. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादनांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे, असेही सत्तार म्हणाले.

राज्यपालांकडूनही मार्गदर्शनया समारंभात ३४ पीएच. डी., १०५ पदव्युत्तर पदवी आणि २१०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले.

जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे, असे डॉ. एस. अय्यपन यांनी यावेळी सांगितले. कृषी विद्यापीठांमधील सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. पदवीदान सोहळ्यापूर्वी राज्यपाल बैस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरी