शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तार म्हणाले, "आता पदवी मिळाली; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत," चूक लक्षात येताच सावरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:33 IST

विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. त्यावेळी सत्तार उपस्थित होते.

रत्नागिरी : आता पदवी मिळाली आहे; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, असे विधान विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, आपली काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढे लगेचच सावरून घेत राज्य सरकार आता ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. त्यात सर्वांना नोकरी मिळेल, असे सांगितले. मात्र, त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. प्र-कुलपती व कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इम्फाळ येथील कुलपती व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन, रत्नागिरीचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच आमदार योगेश कदम, कुलसचिव डॉ. भरत साळवी व्यासपीठावर उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी शरद पवार हेही यावेळी उपस्थित होते.

देशात शहरीकरणाचा जोर वाढत असला तरी शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे, येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील, असे राज्यपालांनी सांगितले. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादनांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे, असेही सत्तार म्हणाले.

राज्यपालांकडूनही मार्गदर्शनया समारंभात ३४ पीएच. डी., १०५ पदव्युत्तर पदवी आणि २१०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले.

जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे, असे डॉ. एस. अय्यपन यांनी यावेळी सांगितले. कृषी विद्यापीठांमधील सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. पदवीदान सोहळ्यापूर्वी राज्यपाल बैस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरी