शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता राज्य हज समितीचे गठन

By admin | Updated: September 11, 2014 00:09 IST

समस्या मिटणार : कोकणातील तीन जिल्ह्यांना प्रतिनिधित्त्व

रत्नागिरी : गेली तीन वर्षे राज्य हज समितीचे गठन केले न गेल्याने राज्यातील हजारो यात्रेकरुंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, अनेक निवेदने, मागण्या व सततच्या गाठीभेटीनंतर राज्य शासनाने राज्य हज समितीचे गठन केले आहे. नवीन हज समितीमध्ये राज्यातील बहुतांश जिल्हा विभागाला प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.राज्य हज समितीच्या घटनेनुसार गठीत समितीचा कार्यकाल तीन वर्षांचा आहे. या मुदतीच्या दरम्यान सत्तापरिवर्तन झाल्यास या समितीला बरखास्त करता येत नाही. तसेच गठीत समितीची मुदत पूर्ण होताच तिच्या बरखास्तीचे आदेश काढण्याची आवश्यकता नाही. ती मुदतीनंतर तत्काळ बरखास्त होत असते. या समितीमध्ये एक खासदार, दोन आमदारपैकी एक विधानसभा व एक विधानपरिषद, तीन नगरसेवक तीन मुस्लिम धर्मगुरु (आलीमेदीन व एक शिया पंथीय)पाच सामाजिक कार्यकर्ते, वक्फ मंडळातील व मंत्रालयातील किमान उपसचिव पदाचा असा प्रत्येकी एक अधिकारी याचा समावेश आहे. मागील राज्य हज समितीची मुदत २९ मे २०११ रोजी समाप्त झाल्यानंतर तीन वर्षांनंतर पुन्हा नवीन समितीचे गठन करण्यात आले आहे.या समितीवर राज्यसभा खासदार अ‍ॅड. मजीद मेमन, विधानसभा आमदार नवाब मलीक, विधानपरिषद आमदार हुस्नबानू खलिफे, नगरसेवक सय्यद फारुख सय्यद करीम, तांबोली शेख फिरोज लाला, नजीब सुलेमान मुल्ला, मौलाना अ. जब्बार माहेरुन काद्री, मौलाना मोईनुद्दीन कासमी, मौलाना अन्सारअली (शिया पंथीय) रियाज इस्माईल सय्यद (पुणे), इब्राहीम गुलामअली शेख (मुंबई), रफीक शफी परकार (रायगड), अ‍ॅड. मेहताब हुसेन काजी (मुंबई), सुलतान शेख (अमरावती), वक्फ मंडळाचे अध्यक्ष व राज्य हज समितीचे कार्यकारी यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)