शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

भारत-पाक फाळणीनंतर देश सोडून गेलेल्यांची जमिनी घेणार ताब्यात, शेतकऱ्यांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 13:25 IST

शासनाने तब्ब्ल ७५ वर्षांनंतर ताबा घेण्यासाठी बजावलेल्या नोटीसमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिपळूण : भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाकडे झुकलेला असताना भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी देश सोडून गेलेल्यांच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील १४ स्थानिक शेतकऱ्यांना महसूल खात्याकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.१० दिवसांत जागेचा ताबा देण्याच्या नोटिसीमुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. पहिल्या टप्प्यातील सुनावणी नुकतीच प्रांताधिकाऱ्यांसमोर झाली.भारत-पाकिस्तान फाळणीत पाकिस्तानमध्ये गेलेल्या नागरिकांनी १९६६ मध्ये आपली मालमत्ता शासनाला हस्तांतरित केली होती. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी २०२० मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती.त्यानुसार अभिरक्षक शत्रु संपत्ती भारत सरकारच्या नावाने या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया देशभरात राबवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १४ शेतकऱ्यांना येथील तहसीलदारांमार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.संबंधित शेतकऱ्यांना शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण १० दिवसात तत्काळ मोकळे करून द्यावे. तसे न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ५० (३) नुसार कारवाई करण्यात येईल. संबंधित जमिनीत केलेले अतिक्रमण वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात काढण्यात येईल.त्यासाठी होणारा खर्चही जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्यात येईल, अशा सूचनाही तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिल्या आहेत.शहर व सावर्डे विभागातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. प्रत्येकी १ ते २ एकर किंवा काहींच्या त्यापेक्षाही अधिक जमिनी शासनाच्या ताब्यात द्याव्या लागणार आहेत. मूळ मालक पाकिस्तानला गेले असले तरी स्थानिक शेतकरी या जमिनी पिढ्यानपिढ्या कसत आहेत. त्यातील काहींची सातबारावर कूळ म्हणून नावे असून, काहींनी तर त्याकाळी बाँडवर जमिनीची रक्कम मोजून खरेदी केली आहे. 

त्यामुळे शासनाने तब्ब्ल ७५ वर्षांनंतर ताबा घेण्यासाठी बजावलेल्या नोटीसमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने याचा फेरविचार करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्यासमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीत काही शेतकऱ्यांनी आपले म्हणणे वकिलांमार्फत सादर केले.

संबंधित शेतकऱ्यांनी याविषयी आपल्याशी संपर्क साधला असून, त्याबाबत लवकरच प्रशासनासमवेत बैठक घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामध्ये काही ठराविक शेतकरी असून, त्यांना दिलासा मिळेल, असे प्रयत्न सुरू आहेत. - शेखर निकम, आमदार - चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी