शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक फाळणीनंतर देश सोडून गेलेल्यांची जमिनी घेणार ताब्यात, शेतकऱ्यांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 13:25 IST

शासनाने तब्ब्ल ७५ वर्षांनंतर ताबा घेण्यासाठी बजावलेल्या नोटीसमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिपळूण : भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाकडे झुकलेला असताना भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी देश सोडून गेलेल्यांच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील १४ स्थानिक शेतकऱ्यांना महसूल खात्याकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.१० दिवसांत जागेचा ताबा देण्याच्या नोटिसीमुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. पहिल्या टप्प्यातील सुनावणी नुकतीच प्रांताधिकाऱ्यांसमोर झाली.भारत-पाकिस्तान फाळणीत पाकिस्तानमध्ये गेलेल्या नागरिकांनी १९६६ मध्ये आपली मालमत्ता शासनाला हस्तांतरित केली होती. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी २०२० मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती.त्यानुसार अभिरक्षक शत्रु संपत्ती भारत सरकारच्या नावाने या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया देशभरात राबवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १४ शेतकऱ्यांना येथील तहसीलदारांमार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.संबंधित शेतकऱ्यांना शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण १० दिवसात तत्काळ मोकळे करून द्यावे. तसे न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ५० (३) नुसार कारवाई करण्यात येईल. संबंधित जमिनीत केलेले अतिक्रमण वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात काढण्यात येईल.त्यासाठी होणारा खर्चही जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्यात येईल, अशा सूचनाही तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिल्या आहेत.शहर व सावर्डे विभागातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. प्रत्येकी १ ते २ एकर किंवा काहींच्या त्यापेक्षाही अधिक जमिनी शासनाच्या ताब्यात द्याव्या लागणार आहेत. मूळ मालक पाकिस्तानला गेले असले तरी स्थानिक शेतकरी या जमिनी पिढ्यानपिढ्या कसत आहेत. त्यातील काहींची सातबारावर कूळ म्हणून नावे असून, काहींनी तर त्याकाळी बाँडवर जमिनीची रक्कम मोजून खरेदी केली आहे. 

त्यामुळे शासनाने तब्ब्ल ७५ वर्षांनंतर ताबा घेण्यासाठी बजावलेल्या नोटीसमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने याचा फेरविचार करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्यासमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीत काही शेतकऱ्यांनी आपले म्हणणे वकिलांमार्फत सादर केले.

संबंधित शेतकऱ्यांनी याविषयी आपल्याशी संपर्क साधला असून, त्याबाबत लवकरच प्रशासनासमवेत बैठक घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामध्ये काही ठराविक शेतकरी असून, त्यांना दिलासा मिळेल, असे प्रयत्न सुरू आहेत. - शेखर निकम, आमदार - चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी