शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कृषी दिन विशेष: पतीच्या पश्चात शेतीच्या मातीत कोरली ‘सुवर्णा’क्षरे

By मेहरून नाकाडे | Updated: July 1, 2025 16:47 IST

उच्चशिक्षित, MPSC पूर्व परीक्षा पास, लग्नानंतर यावे लागले खेडेगावात 

मेहरून नाकाडेरत्नागिरी : उच्चशिक्षित, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पास, मात्र लग्नानंतर पुणे सोडून तालुक्यातील ‘रीळ’सारख्या खेडेगावात यावे लागलेल्या सुवर्णा मिलिंद वैद्य यांना खेडेगावाचा अनुभव नव्हता. मात्र त्यांनी मनापासून गावातील वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतलं. पती मिलिंद वैद्य यांच्यामुळे त्यांना शेतीची गोडी लागली. दुर्दैवाने मिलिंद वैद्य यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र सुवर्णा यांनी न डगमगता पती करत असलेल्या शेतीमध्ये पूर्ण लक्ष घातले. कै. मिलिंद वैद्य यांनी भाताचे सर्वाधिक उत्पन्न घेण्याचा विक्रम केला होता. आता त्याच पावलांवर सुवर्णा यांनीही पाऊल ठेवलं आहे.हेक्टरी अडीच टन भात उत्पादन घेत कै. मिलिंद यांनी तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर पारितोषिके मिळविली होती. त्यांच्या निधनानंतर भातशेती उत्पादनाचे पहिलेच वर्ष असतानाही गतवर्षी सुवर्णा यांना सव्वादोन टन उत्पादन घेण्यात यश आले. सुधारित वाणामध्ये ‘रत्नागिरी आठ’ शिवाय पारंपरिक बियाणांमध्ये लाल तांदळासाठी कुडा, पटणी या वाणाची लागवड त्या करतात. खरीप हंगामात त्या १० ते १२ टन भाताचे उत्पादन घेतात.भाताच्या बांधावर नाचणी, वरी, उडीद तर भात कापणीनंतर कुळीथ, मूग, पावटा, चवळी तसेच पालेभाज्याशिवाय दुधाळ जनावरांसाठी मका लागवड करत आहेत. केवळ पावसाळी शेतीच नाही तर उन्हाळ्यात आंबा उत्पादनही त्या घेतात. त्याशिवाय आमरस, अमृत कोकम, पन्ह, आगळ, आमसुले, फणसाचे गरे, तांदूळ पीठ, कुळीथ पीठ, नाचणी पीठ, तांदूळ, नारळ, खोबरे, सुपारी तसेच कडधान्यांची विक्री करतात.

दुग्धोत्पादन व्यवसायशेतीला पूरक दुग्धोत्पादन व्यवसायातही त्यांनी लक्ष घातले असून, १४ दुधाळ जनावरांचे संगोपन त्यांनी केले आहे. गावठी, गीर गायी, मुऱ्हा जातीच्या म्हशींचा त्यामध्ये समावेश आहे. दररोज ४० लिटर दुधाची त्या विक्री करतात. शिवाय तूप तयार करून त्याची विक्री करत आहेत. जनावरांचे शेणापासून कंपोस्ट खत, जिवामृत तयार करून शेतीसाठी वापरत आहेत.

मिलिंद वैद्य यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलाैकिक मिळविला होता. २०१६ साली त्यांनी भाताचे विक्रमी उत्पादन घेत जागतिक स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या पश्चात सुवर्णाताईंनी पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी त्या विशेष परिश्रम घेत आहे. बारमाही शेती, पूरक प्रक्रिया व्यवसाय, दुग्धव्यवसाय विकसित करत असून, त्यांच्याकडे २० लोकांना दैनंदिन रोजगार मिळाला आहे. कोणत्याही पिकाचा लागवडपूर्व, पश्चात अभ्यास करून स्वत: मार्केटिंग करतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. - विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी