शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दिन विशेष: पतीच्या पश्चात शेतीच्या मातीत कोरली ‘सुवर्णा’क्षरे

By मेहरून नाकाडे | Updated: July 1, 2025 16:47 IST

उच्चशिक्षित, MPSC पूर्व परीक्षा पास, लग्नानंतर यावे लागले खेडेगावात 

मेहरून नाकाडेरत्नागिरी : उच्चशिक्षित, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पास, मात्र लग्नानंतर पुणे सोडून तालुक्यातील ‘रीळ’सारख्या खेडेगावात यावे लागलेल्या सुवर्णा मिलिंद वैद्य यांना खेडेगावाचा अनुभव नव्हता. मात्र त्यांनी मनापासून गावातील वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतलं. पती मिलिंद वैद्य यांच्यामुळे त्यांना शेतीची गोडी लागली. दुर्दैवाने मिलिंद वैद्य यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र सुवर्णा यांनी न डगमगता पती करत असलेल्या शेतीमध्ये पूर्ण लक्ष घातले. कै. मिलिंद वैद्य यांनी भाताचे सर्वाधिक उत्पन्न घेण्याचा विक्रम केला होता. आता त्याच पावलांवर सुवर्णा यांनीही पाऊल ठेवलं आहे.हेक्टरी अडीच टन भात उत्पादन घेत कै. मिलिंद यांनी तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर पारितोषिके मिळविली होती. त्यांच्या निधनानंतर भातशेती उत्पादनाचे पहिलेच वर्ष असतानाही गतवर्षी सुवर्णा यांना सव्वादोन टन उत्पादन घेण्यात यश आले. सुधारित वाणामध्ये ‘रत्नागिरी आठ’ शिवाय पारंपरिक बियाणांमध्ये लाल तांदळासाठी कुडा, पटणी या वाणाची लागवड त्या करतात. खरीप हंगामात त्या १० ते १२ टन भाताचे उत्पादन घेतात.भाताच्या बांधावर नाचणी, वरी, उडीद तर भात कापणीनंतर कुळीथ, मूग, पावटा, चवळी तसेच पालेभाज्याशिवाय दुधाळ जनावरांसाठी मका लागवड करत आहेत. केवळ पावसाळी शेतीच नाही तर उन्हाळ्यात आंबा उत्पादनही त्या घेतात. त्याशिवाय आमरस, अमृत कोकम, पन्ह, आगळ, आमसुले, फणसाचे गरे, तांदूळ पीठ, कुळीथ पीठ, नाचणी पीठ, तांदूळ, नारळ, खोबरे, सुपारी तसेच कडधान्यांची विक्री करतात.

दुग्धोत्पादन व्यवसायशेतीला पूरक दुग्धोत्पादन व्यवसायातही त्यांनी लक्ष घातले असून, १४ दुधाळ जनावरांचे संगोपन त्यांनी केले आहे. गावठी, गीर गायी, मुऱ्हा जातीच्या म्हशींचा त्यामध्ये समावेश आहे. दररोज ४० लिटर दुधाची त्या विक्री करतात. शिवाय तूप तयार करून त्याची विक्री करत आहेत. जनावरांचे शेणापासून कंपोस्ट खत, जिवामृत तयार करून शेतीसाठी वापरत आहेत.

मिलिंद वैद्य यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलाैकिक मिळविला होता. २०१६ साली त्यांनी भाताचे विक्रमी उत्पादन घेत जागतिक स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या पश्चात सुवर्णाताईंनी पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी त्या विशेष परिश्रम घेत आहे. बारमाही शेती, पूरक प्रक्रिया व्यवसाय, दुग्धव्यवसाय विकसित करत असून, त्यांच्याकडे २० लोकांना दैनंदिन रोजगार मिळाला आहे. कोणत्याही पिकाचा लागवडपूर्व, पश्चात अभ्यास करून स्वत: मार्केटिंग करतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. - विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी