शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एकही रुपया न घेता उच्च न्यायालयात माणुसकीची लढाई, ॲड. ओवेस पेचकर दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:17 IST

वर्षभर दाद मागून व उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने अखेर चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी दखल घेतली

चिपळूण : तालुक्यातील पेढे कुंभारवाडी येथे गतवर्षी २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. वर्षभर दाद मागून व उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने अखेर चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी याविषयी दखल घेत थेट न्यायालयीन नव्हे तर माणुसकीचा लढा सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाकडून न्यायालयीन लढ्यासाठी शुल्क स्वरूपात एकही रुपया न घेण्याचे ठरवले आहे.ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाविषयी व खड्ड्यांप्रश्नी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या लढ्यामुळे या कामावर नियंत्रण आले आहे. परशुराम येथील ग्रामस्थांच्या चौपदरीकरणात गेलेल्या जागांचा मोबदल्या प्रश्नी न्यायालयीन लढा सुरू आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी व लांजा येथील रखडलेल्या एसटी बसस्थानकाच्या कामाविषयीही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. चिपळुणातील २०२१ मधील महापुरातही प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने हलगर्जी करून जनतेचा जीव धोक्यात घातल्याबाबतही दाद मागितली आहे. या प्रत्येक न्यायालयीन लढ्यात त्यांनी जनहितार्थ उडी घेतली आहे.ॲड. पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पेढे गावातील दरडग्रस्त कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी नवा लढा सुरू केला आहे. गतवर्षी परशुराम घाटातील दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे संचालक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अशा एकूण नऊ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी पोलीस स्थानकात दाखल झाला आला. कोकणात प्रथमच असा गुन्हा नोंद झाला आहे. या कुटुंबाला शेवटपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेढे येथील मांडवकर हे अत्यंत गरीब कुटुंब आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू होऊनही त्यांना कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही. वर्षभर त्यांनी शासन दरबारी फेऱ्या मारल्या. परंतु त्यांना कोणीही दाद दिली नाही. त्यामुळेच याविषयी आपण लक्ष घातले असून निव्वळ माणुसकी म्हणून त्यांच्याकडून एकही रुपया आपण घ्यायचे नाही, असे ठरविले आहे. - ॲड. ओवेस पेचकर, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय