शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

एकही रुपया न घेता उच्च न्यायालयात माणुसकीची लढाई, ॲड. ओवेस पेचकर दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:17 IST

वर्षभर दाद मागून व उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने अखेर चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी दखल घेतली

चिपळूण : तालुक्यातील पेढे कुंभारवाडी येथे गतवर्षी २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. वर्षभर दाद मागून व उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने अखेर चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी याविषयी दखल घेत थेट न्यायालयीन नव्हे तर माणुसकीचा लढा सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाकडून न्यायालयीन लढ्यासाठी शुल्क स्वरूपात एकही रुपया न घेण्याचे ठरवले आहे.ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाविषयी व खड्ड्यांप्रश्नी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या लढ्यामुळे या कामावर नियंत्रण आले आहे. परशुराम येथील ग्रामस्थांच्या चौपदरीकरणात गेलेल्या जागांचा मोबदल्या प्रश्नी न्यायालयीन लढा सुरू आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी व लांजा येथील रखडलेल्या एसटी बसस्थानकाच्या कामाविषयीही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. चिपळुणातील २०२१ मधील महापुरातही प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने हलगर्जी करून जनतेचा जीव धोक्यात घातल्याबाबतही दाद मागितली आहे. या प्रत्येक न्यायालयीन लढ्यात त्यांनी जनहितार्थ उडी घेतली आहे.ॲड. पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पेढे गावातील दरडग्रस्त कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी नवा लढा सुरू केला आहे. गतवर्षी परशुराम घाटातील दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे संचालक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अशा एकूण नऊ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी पोलीस स्थानकात दाखल झाला आला. कोकणात प्रथमच असा गुन्हा नोंद झाला आहे. या कुटुंबाला शेवटपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेढे येथील मांडवकर हे अत्यंत गरीब कुटुंब आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू होऊनही त्यांना कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही. वर्षभर त्यांनी शासन दरबारी फेऱ्या मारल्या. परंतु त्यांना कोणीही दाद दिली नाही. त्यामुळेच याविषयी आपण लक्ष घातले असून निव्वळ माणुसकी म्हणून त्यांच्याकडून एकही रुपया आपण घ्यायचे नाही, असे ठरविले आहे. - ॲड. ओवेस पेचकर, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय