शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय समितीच्या पथकाने केली मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:12 IST

नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टबाबत काय कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक गुरुवारी मुरुडमध्ये दाखल झाले आहे. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर पदाचा गैरवापर करून सीआरझेडचा भंग केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर केंद्राच्या एका पथकाने सीआरझेडबाबत दापाेली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी केली आणि हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.हे आदेश देण्यात आल्यानंतर पुढे काय कारवाई झाली आहे, याची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण खात्याचे पाच जणांचे पथक गुरुवारी मुरुडमधल्या रिसाॅर्टवर दाखल झाले आहेत.या पथकामध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. साई रिसाॅर्टप्रमाणे सी कोच रिसाॅर्टचीही चौकशी या पथकाकडून केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे.राज्य पर्यावरण विभाग व केंद्र पर्यावरण विभाग अशा दोन्ही टीम प्रथमच एकत्र पाहणीसाठी आल्या आहेत. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात माहिती घेतली.साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कारवाई थांबलीच होती. आता सरकार बदलल्यानंतर या कारवाईला गती आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परब