शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यात १०४ नव्या रुग्णांची भर; पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात १०४ रुग्णांची नव्याने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात १०४ रुग्णांची नव्याने भर पडली असल्याने आता एकूण रुग्णसंख्या ७५,१४३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २,२६३ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. तर एकाच दिवसांत तब्बल ३६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्यांची संख्या ७१,७४१ (९५.४८ टक्के) इतकी आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार, १,५२७ कोरोना चाचणीसाठी अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी १,४८१ अहवाल निगेटिव्ह तर १०४ अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात आरटीपीसीआर चाचणीत ४६ आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत ५८ अहवाल पाॅझिटिव्ह आले. आतापर्यंत निगेटिव्ह अहवाल आलेल्यांची संख्या ६,३६,३८२ इतकी आहे.

मंगळवारी जिल्ह्यात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात मंगळवारी ३ आणि त्यापूर्वीच्या दोन रुग्णांच्या समावेश असून यात गुहागर आणि संगमेश्वरमधील प्रत्येकी १ आणि चिपळूणमधील ३ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १,८९७ रुग्ण ५० व त्यावरील वयोगटातील असून सहव्याधी असलेल्या ८०६ जणांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात १,०६० रुग्ण विविध कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी गृह विलगीकरणात ५६५ आणि संस्थापक विलगीकरणात ४९५ रुग्ण उपचार घेत आहेत. डीसीएचसीमध्ये १२१, डीसीएचमध्ये १६१ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी १२३ जणांना ऑक्सिजन सुरू असून ६६ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

गेल्या आठवड्यातील मृत्यू दर ३.६६ इतका होता तर मंगळवारी एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेने ०.४७ इतका आहे.