शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

हापूसवरील कीडरोग नियंत्रणासाठी कृती दल, संशोधन करून उपाय शोधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:08 IST

कृतिदलामुळे संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

रत्नागिरी : वादळी वारे, गारपीट, हापूस आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडींचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा याकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील हापूस आंबा पिकासाठी कृतिदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करून उपाय शोधण्याची मुख्य जबाबदारी या कृतिदलाकडे देण्यात आली आहे. तसा शासकीय अध्यादेश जारी झाला आहे.आठ सदस्यीय कृतिदलात दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे. या कृतिदलाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीडरोगांच्या प्रभावी नियंत्रणाकरिता संशोधन करून उपाययोजना कराव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनाला सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील अधिकाऱ्यांची बैठक घेत कृतिदल स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या कृतिदलामुळे संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

असे आहे कृतिदलआंबा पिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृतिदलाचे अध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक आहेत. या दलामध्ये सदस्य म्हणून कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख, उद्यानविद्या विभाग सहायक प्राध्यापक, कीटकनाशक विभाग सहायक प्राध्यापक, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची तर सदस्य सचिव म्हणून कोकण विभागीय कृषी सहसंचालक यांची नियुक्ती झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा