शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

हापूसवरील कीडरोग नियंत्रणासाठी कृती दल, संशोधन करून उपाय शोधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:08 IST

कृतिदलामुळे संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

रत्नागिरी : वादळी वारे, गारपीट, हापूस आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडींचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा याकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील हापूस आंबा पिकासाठी कृतिदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करून उपाय शोधण्याची मुख्य जबाबदारी या कृतिदलाकडे देण्यात आली आहे. तसा शासकीय अध्यादेश जारी झाला आहे.आठ सदस्यीय कृतिदलात दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे. या कृतिदलाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीडरोगांच्या प्रभावी नियंत्रणाकरिता संशोधन करून उपाययोजना कराव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनाला सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील अधिकाऱ्यांची बैठक घेत कृतिदल स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या कृतिदलामुळे संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

असे आहे कृतिदलआंबा पिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृतिदलाचे अध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक आहेत. या दलामध्ये सदस्य म्हणून कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख, उद्यानविद्या विभाग सहायक प्राध्यापक, कीटकनाशक विभाग सहायक प्राध्यापक, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची तर सदस्य सचिव म्हणून कोकण विभागीय कृषी सहसंचालक यांची नियुक्ती झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा