शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:13 IST

Crimenews Ratnagiri police- तुरुंगातून नुकताच सुटलेला आरोपी संशयितरित्या फिरताना दिसल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन पळण्यात यशस्वी झालेल्या आरोपीला १४ दिवसांत पुन्हा पकडण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हेमंत पांडुरंग देसाई (२९, रा. कांदिवली, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

ठळक मुद्देपोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआडरत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : तुरुंगातून नुकताच सुटलेला आरोपी संशयितरित्या फिरताना दिसल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन पळण्यात यशस्वी झालेल्या आरोपीला १४ दिवसांत पुन्हा पकडण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हेमंत पांडुरंग देसाई (२९, रा. कांदिवली, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती.रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलीस अंमलदार प्रवीण कृष्णा खांबे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत होते. त्याचवेळी सन्मित्रनगर ते उद्यमनगर रस्त्यावरील ओसवालनगर येथे नुकताच तुरंगातून सुटलेला आरोपी हेमंत देसाई संशयितरीत्या दिसला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसाच्या डोक्यावर दगड मारला. मात्र, प्रसंगावधान राहून तो दगड त्यांनी चुकविला.

त्याचवेळी तो पळून जाऊ नये यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हेमंतने प्रवीण खांबे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर चावा घेऊन पोलिसांचीच दुचाकी चोरून पळाला होता. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे खास पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हेमंत देसाई ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील खेडशी येथे तो येणार असल्याची माहिती मिळाली.

रेल्वे स्थानक ते हातखंबा मार्गावर गस्त घालत असताना खेडशी येथील चाँदसूर्या येथे हेमंत देसाई याला पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद कदम, आशिष शेलार, पोलीस नाईक बाळू पालकर, रमिज शेख, अमोल भोसले, सत्यजित दरेकर, चालक दत्तात्रय कांबळे यांनी ही कामगिरी केली.आतापर्यंत १६ गुन्हे दाखल असलेला संशयितहेमंत देसाई हा मूळचा देऊड (ता. रत्नागिरी) येथील राहणारा आहे. त्यामुळे त्याचे मूळ गावी येणे जाणे असते. त्याच्यावर यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात चोरीचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबई परिसरात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी व सरकारी कामात अडथळा यासारखे ११ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी