शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:44 IST

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील ...

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. बुधवारी, दि. ३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक शैलेश संपत बिरामणे (३२, रा. मुंबई) हा ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ६९०१) घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी ट्रॅव्हलरमध्ये संगीता नितीन रायचुरा (५४), अंजली सतीश सबसुळे (५२), संगीता ओमप्रकाश गोंधळे (४७), देवांशी जितेंद्र ठाकूर (१२), चेतना बाबालाल ठाकूर (४३), नितीन रायचुरा (५६), जितेंद्र लालसिंग ठाकूर (४४), सतीश विठ्ठलराव सबसुळे (५८), ओमप्रकाश गंगाराम गोंधळे (६०, सर्व रा. अमरावती) हे प्रवासी होते.हे प्रवासी प्रथम मुंबईमध्ये आले. तेथून ते गोव्याला गेले. बुधवारी ते मुंबईच्या दिशेने परत निघाले असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील तुळशी ते खवटी गावांदरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व क्षणार्धात चारपदरी रस्त्यामधील दुभाजक ओलांडून ट्रॅव्हलर पलीकडच्या बाजूला जाऊन कठड्यावर धडकली. या अपघातात चालकासह दहा जण जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांना डोके, हात, पाय, छातीला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णवाहिकांची मदतशासनाची १०८ सेवा, शिवतेज आरोग्य सेवा संस्था, शिवसेना, प्रसिद्धी रुग्णवाहिका, जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान नाणिजची रुग्णवाहिका यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्या.

मदतीसाठी अनेकजण पुढेया अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी नगरसेवक सतीश चिकणे, मिलिंद काते यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी व कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली व त्यांना मदत केली.

तज्ज्ञांअभावी फक्त मलमपट्टीचकळंबणी येथे असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा प्रकर्षाने जाणवत होती. या ठिकाणी एकही ऑर्थोपेडिक सर्जन नसल्यामुळे मलमपट्टी करण्याखेरीज कोणतेही उपचार जखमींना मिळाले नाहीत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात