शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:44 IST

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील ...

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. बुधवारी, दि. ३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक शैलेश संपत बिरामणे (३२, रा. मुंबई) हा ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ६९०१) घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी ट्रॅव्हलरमध्ये संगीता नितीन रायचुरा (५४), अंजली सतीश सबसुळे (५२), संगीता ओमप्रकाश गोंधळे (४७), देवांशी जितेंद्र ठाकूर (१२), चेतना बाबालाल ठाकूर (४३), नितीन रायचुरा (५६), जितेंद्र लालसिंग ठाकूर (४४), सतीश विठ्ठलराव सबसुळे (५८), ओमप्रकाश गंगाराम गोंधळे (६०, सर्व रा. अमरावती) हे प्रवासी होते.हे प्रवासी प्रथम मुंबईमध्ये आले. तेथून ते गोव्याला गेले. बुधवारी ते मुंबईच्या दिशेने परत निघाले असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील तुळशी ते खवटी गावांदरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व क्षणार्धात चारपदरी रस्त्यामधील दुभाजक ओलांडून ट्रॅव्हलर पलीकडच्या बाजूला जाऊन कठड्यावर धडकली. या अपघातात चालकासह दहा जण जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांना डोके, हात, पाय, छातीला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णवाहिकांची मदतशासनाची १०८ सेवा, शिवतेज आरोग्य सेवा संस्था, शिवसेना, प्रसिद्धी रुग्णवाहिका, जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान नाणिजची रुग्णवाहिका यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्या.

मदतीसाठी अनेकजण पुढेया अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी नगरसेवक सतीश चिकणे, मिलिंद काते यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी व कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली व त्यांना मदत केली.

तज्ज्ञांअभावी फक्त मलमपट्टीचकळंबणी येथे असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा प्रकर्षाने जाणवत होती. या ठिकाणी एकही ऑर्थोपेडिक सर्जन नसल्यामुळे मलमपट्टी करण्याखेरीज कोणतेही उपचार जखमींना मिळाले नाहीत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात