पाेलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:50+5:302021-09-26T04:34:50+5:30
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ, सेक्स रॅकेट व गांजासह विविध घटना घडत आहेत. या ...

पाेलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांचा गाैरव
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ, सेक्स रॅकेट व गांजासह विविध घटना घडत आहेत. या घटनेच्या संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनांचा तपास करून त्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाेलीस अधिकारी आणि अंमलदारांचा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी गाैरव केला. तसेच या घटना अजून घडू नयेत आणि या घटनेपासून रत्नागिरी जिल्हा कसा दूर राहील यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
गेल्या महिन्यात रत्नागिरी शहरात तीन ठिकाणी गांजा विक्री होणार असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून शहर पोलिसांना संशयित आरोपींना पकडण्यात यश आले होते. त्याचबरोबर जनआशीर्वाद यात्रेदरम्यान चेन चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील संशयित आरोपींना पकडण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले आहे.
गुन्ह्याचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी शुक्रवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन गाैरव केला. या काैतुकाने अधिकारी आणि अंमलदारही भारावून गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, विजय जाधव, पोलीस नाईक प्रवीण बर्गे, गणेश सावंत, राहुल घोरपडे, नंदकुमार सावंत, योगेश नार्वेकर, वैभव नार्वेकर, विशाल आलीम, निखिल माने, पोलीस हेड काॅन्स्टेबल जयवंत बगड, सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण हरचकर यांचा गाैरव करण्यात आला.
यावेळी डाॅ. गर्ग यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावाही घेतला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ, गांजा अशा विविध घटनांमधून आपल्याला मुक्त ठेवायचे आहे. अशा घटना जर कुठे घडत असतील त्यांच्यावर कारवाई ही आपण करायची आहे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.