शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Ratnagiri: संगमेश्वरात कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून तरुणावर तलवारीने वार, गंभीर जखमी

By अरुण आडिवरेकर | Updated: April 19, 2023 11:41 IST

या घटनेनंतर साखरपा गावात तणाव

रत्नागिरी : कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा (ता. संगमेश्वर) येथील सागर वैद्य (वय-२२) या तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याची घटना मंगळवारी (दि.१८) घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर साखरपा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी साखरपा दूरक्षेत्राला घेराव घालत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. या घटनेमुळे साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखरपा गावाकडे रवाना झाली होती. तर उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे हे रात्री घटनास्थळी दाखल झाले होते.गेले तीन दिवस साखरपा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीच्या सामन्यादरम्यान त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तरुणाला बाजूला होण्याची काही प्रेक्षकांनी सूचना केली. यातूनच वादाला सुरुवात झाली. परंतु, त्यानंतर हा वाद चर्चेद्वारे मिटवण्यात आला होता. मात्र संबंधित व्यक्तींच्या डोक्यात राग खदखदत होता.ज्या तरुणाबद्दल राग होता, ज्याच्यावर हल्ला करायचा होता, तो तरुण जी गाडी चालवत होता तीच गाडी घेऊन सागर गेला होता. परंतु, ती व्यक्ती वादातील असल्याचा समज करून घेऊन १० जणांनी तलवारीने सागर वैद्य याच्यावर सपासप वार केले. यामध्ये सागर जखमी अवस्थेत कोसळला. त्याला तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेनंतर साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून, मोठा जमाव साखरपा दूरक्षेत्रावर धडकला होता. तर रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार तेथील एका हॉटेलवर हल्ला झाल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर साखरपा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस