शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटसह अन्य कामांसाठी केंद्राकडे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविणार - मंत्री भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:59 IST

डिसेंबर २०२५ला रस्ता नीट असेल

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील सातत्याने अपघात होणारी ठिकाणे, सर्व्हिस रोड, पुलाखालील रस्ते, उड्डाणपूल अशा विविध कामांसाठी आणखी २०० कोटी रुपयांची गरज असून, तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तयार केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेमध्ये दिली.गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी पनवेल येथून मंत्री भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी सुरू केली. सायंकाळी उशिरा ते जिल्ह्यात दाखल झाले. कशेडी बोगद्याची पाहणी करून ते रत्नागिरीत आले. शुक्रवारी सकाळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कामाचा आढावा घेतला.

गणेशोत्सवाला बहुसंख्य चाकरमानी जिल्ह्यात येतात. अशावेळी लोकांना वाहतूक सुरळीत ठेवणे, काही ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करणे, पर्यायी रस्ते सुस्थितीत ठेवणे, भूसंपादन, महामार्गावर जिल्ह्यात १० ठिकाणी सुविधा केंद्र उभारणे, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. संगमेश्वर येथील रस्त्याच्या कामाकडे ठेकेदाराने गांभीर्याने लक्ष न दिल्यास ठेकेदार बदलावा लागेल, असे ठेकेदाराला स्पष्ट शब्दात सुनावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भूसंपादन कामामध्ये पैशांची अडचण येणार नाही, ते पैसे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे उपलब्ध आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कामामध्ये दर्जा राखणे आवश्यकच आहे. त्यासाठी कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषी असल्यास ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, अशी भूमिका त्यांनी मांडली. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे डिझाइन बदलले आहे. त्या ठेकेदाराला एकही रुपया न देता तो ठेकेदारच त्यावर स्वत: खर्च करत आहे. काही ठिकाणच्या सर्व्हिस रोडचा दर्जा खराब असून, तो रस्ता दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असल्याचेही त्यांनी सांगितले.गेल्या दीड वर्षात सरकार सत्तेवर आल्यावर राज्यातील ठेकेदारांची साडेनऊ हजार कोटींची देणी देण्यात आली आहेत. त्यामध्ये कोकणही आहे. उरलेले पैसे पुढील काही दिवसांतच ठेकेदारांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिसेंबर २०२५ला रस्ता नीट असेलअनेक ठिकाणचे रस्त्याचे, पुलांचे, उड्डाणपुलाचे, सर्व्हिस रोडचे काम बाकी आहे. ही कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील आणि जिल्ह्यातील महामार्गाचे काम डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.