शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रत्नागिरीत साकारणार ४० फुटी बुद्धमूर्तीसह ध्यानकेंद्र

By शोभना कांबळे | Updated: September 19, 2024 17:37 IST

रत्नागिरी : शहरातील संसारे उद्यानामध्ये ४० फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती असलेले ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री ...

रत्नागिरी : शहरातील संसारे उद्यानामध्ये ४० फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती असलेले ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या या ध्यानकेंद्रासाठी २० कोटी रुपये खर्च येणार आहे. हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या प्रशस्त इमारतीत १२० नागरिकांना एकाचवेळी ध्यान करता येणार आहे.या कामासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात पाच कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी रुपये मिळाले आहेत. या ध्यानकेंद्रामुळे रत्नागिरी शहरात आध्यात्मिक केंद्र सुरू होणार आहे. पर्यटनवाढीसाठी पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी शहरात ही नवी संकल्पना आणली आहे. शहरातील संसारे उद्यानात या ध्यानकेंद्राचे काम सुरू आहे. पूर्वी या उद्यानाची देखभाल दुरुस्ती होत नव्हती. त्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली होती. मात्र, आता या जागेत हे ध्यानकेंद्र उभारले जात आहे. येथील इमारतीत नागरिकांना ध्यान सभागृह, आध्यात्मिक बुक स्टॉल, सुशोभित उद्यान आणि वाहनतळाची व्यवस्था असेल. रत्नागिरी नगर परिषदेने ध्यानकेंद्र उभारण्याचे काम स्वामी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे.

पालकमंत्री सामंत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ उभारलेली शिवसृष्टी, जिजामाता उद्यानात संभाजींचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि स्वा. सावरकर पुतळ्याजवळ म्युरल्स उभारण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर शहर सुशोभीकरणाची विविध कामे सुरू असल्यामुळे रत्नागिरी सुंदर शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातील संसारे उद्यानात ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे. या ध्यानकेंद्राचे काम हे नगर परिषदेच्या अखत्यारित असून, स्थानिक कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे. या कामाला एक वर्षाची मुदत असून, सुमारे २० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी, नगर परिषद, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत