शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मासेमारी करताना समुद्रात पडला पण..; रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:57 IST

ग्रामस्थांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना

रत्नागिरी : मासेमारी करताना समुद्राला आलेल्या उधाणामुळे पाण्यात पडून एकाच्या जीवावर बेतल्याचा प्रसंग बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे घडला. सुदैवाने हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या वेळीच लक्षात आल्याने या व्यक्तीला वाचविण्यात यश आले. रहिम शेख असे या व्यक्तीचे नाव असून, ते पुण्यातील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.पावसाळी हंगामामुळे सध्या खाेल समुद्रातील मासेमारी बंद आहे. त्यामुळे अनेक जण मासे गरविण्यासाठी समुद्रकाठी जात आहेत. रहिम शेख हे बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला आपल्या मुलासोबत रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या बंदर येथील भारतीय शिपियार्ड बोलाडजवळ मासेमारी करण्यासाठी गेले हाेते. समुद्राला प्रचंड उधाण आलेले असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, ताे न ऐकता ते मासेमारीसाठी पुढे गेले. मासेमारी करत असताना अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने रहिम शेख समुद्रात पडले.

सुदैवाने समुद्राला भरती असल्याने लाटेबराेबर ते किनाऱ्यावर येऊन खडकावर आदळले. हा प्रकार तेथीलच स्थानिक ग्रामस्थ अमित सावंत, अमर पवार, किरण शिंदे आणि अवधूत चव्हाण यांनी पाहिला आणि ते तत्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी रहिम शेख यांना समुद्रातून बाहेर काढले. ग्रामस्थांच्या या समयसूचकतेमुळे रहिम शेख यांचा जीव वाचला.

ग्रामस्थांच्या सूचनेकडे दुर्लक्षकाही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कापडगाव येथील एका तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाला होता. स्थानिक लोक धोक्याची सूचना देत असतानाही अनेकदा पर्यटक किंवा नागरिक दुर्लक्ष करतात, त्यामुळे अशा दुर्घटना घडतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.