शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

आंब्यासाठी यंदा भरपूर थांबा!, थंडी गायब झाल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 12:01 IST

बाजारात हापूसचा तुटवडा भासणार

रत्नागिरी : हवामानातील बदलांमुळे आंबा पिकावर परिणाम झाला आहे. गेले चार-पाच दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल झाला आहे. थंडी गायब झाली असून, दिवसा कडाक्याचे ऊन पडत आहे. थंडी नसल्याने आता कुठे सुरू झालेली मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका आहे. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प आहे. पावसाळ्यात झाडांना आलेला मोहोर कीडरोगापासूच वाचविण्यात ज्या शेतकऱ्यांना यश आले आहे, त्या झाडांचा आंबा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येण्याची शक्यता आहे, मात्र त्याचे प्रमाण किरकोळ असेल.यावर्षी पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. पहिल्या टप्प्यात काही झाडांना मोहोर आला, परंतु हे प्रमाण अवघे दहा टक्के होते. त्यातही कीडरोग, बुरशी, तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वेळोवेळी झाला. काही बागायतदारांनी कीटकनाशकांची फवारणी करून मोहोर व झालेली फळधारणा वाचवली आहे. हा आंबा दुसऱ्या टप्प्यात २० मार्चनंतरच बाजारात येणार आहे. दि. २० मार्च ते १५ एप्रिलपर्यंत हा आंबा बाजारात येईल, त्यानंतर मात्र बाजारात हापूसचा तुटवडा भासेल. एकूणच हवामानातील बदलांमुळे दुसऱ्या टप्प्यात मोहोर प्रक्रिया झालीच नाही. त्यामुळे बागायतदारांसाठी हे फार मोठे संकट आहे.मागच्या दोन आठवड्यांत कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया किरकोळ प्रमाणात सुरू झाली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून पुन्हा थंडी गायब झाली आहे. पहाटे थोडाफार गारवा असला, तरी दिवसा मात्र कडकडीत ऊन आहे. या उष्म्यामुळे आता मोहोर प्रक्रिया पुन्हा थांबून पुन्हा कलमे पालवीकडे वर्ग होण्याचा धोका आहे.

सध्याच्या मोहोरावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. उष्मा कमी होऊन थंडी कायम असेल, तर तो आंबा १० मे नंतरच बाजारात येईल. त्यामुळे फेब्रुवारीनंतरच आंबा हंगामाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. तुलनेने अपेक्षित दर प्राप्त होत नसल्याने बागायतदारांची आर्थिक गणिते मात्र विस्कटत आहेत.

यावर्षी थंडीचे प्रमाण असमान राहिल्याने मोहोर प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्याने पिकाच्या संरक्षणासाठी महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान