शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

चिपळुणातील नांदिवसेच्या डोंगराला पडली मोठी भेग, दहा कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 16:52 IST

खबरदारी म्हणून दहा कुटुंबांतील ४० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

चिपळूण : तालुक्यात सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या नांदिवसे ग्रामपंचायतीमधील राधानगरवाडीच्या वरील डोंगराला २०० मीटरची भेग पडली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दहा कुटुंबांतील ४० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तसेच एनडीआरएफच्या माध्यमातून प्रशासनाने येथील बारीक हालचालींवर लक्ष ठेवले आहे.तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील दसपटी विभागातील तिवरे येथे धरण फुटीची घटना घडली होती. या दुर्घटनेत तब्बल २२ जणांचा बळी गेला होता. त्याचवेळी या विभागातील अनेक डोंगराना भेगा पडल्या होत्या. मात्र, आता पुन्हा या भागात डोंगर खचून भेगा पडू लागल्या आहेत. याच विभागात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नांदिवसे-राधानगर येथील गावाच्या वरील डोंगराला असलेल्या स्वयंदेव वाकरी धनगरवाडी येथे मोठी भेग गेली आहे. साधारण २०० मीटर लांबीची व एक मीटर रुंदीची भेग पडली आहे. याविषयी नांदिवसेच्या तलाठ्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार हालचाली सुरू केल्या आहेत.गेले काही दिवस कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफची पथके आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आधीच तैनात करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे चिपळूण येथील एनडीआरएफच्या पथकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या डोंगराला यापूर्वीच भेग पडली होती. मात्र, यावेळच्या पावसामुळे ती अधिक रुंदावली आहे.

याबाबत माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी नांदिवसे येथे जाऊन पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. डाेंगराच्या पायथ्याशी असलेल्या राधानगरवाडीतील धोक्याच्या छायेत असलेल्या दहा कुटुंबांचे तत्काळ जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व काही घरांमध्ये स्थलांतर केले. तसेच स्वयंदेव येथील १९ कुटुंबांनाही सुरक्षितस्थळी हलवले आहे. गावचे तलाठी नंदगवळी व ग्रामसेवक हांगे यांच्यामार्फत गावात जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी