शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

By मेहरून नाकाडे | Updated: May 25, 2023 14:26 IST

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९६.०१ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने  राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले  असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.२० टक्केने निकाल घसरला आहे.  राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे मंडळाचा ९३.३४ टक्के तर कोल्हापूर मंडळाचा ९३.२८ टक्के इतका निकाल लागला आहे. पुणे व कोल्हापूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक कमी निकाल मुंबई मंडळाचा असून ८८.१३ टक्के इतका लागला आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार २२ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १२ हजार ३२० मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.   मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.६० टक्के इतके आहे.  मंडळातून १३ हजार ६ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १२ हजार ६७० विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.४१ टक्के आहे.  मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण २.८१ टक्केने अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार १३४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती पैकी १७ हजार ६९ परीक्षेस बसले होते. त्यातील १६ हजार २५४ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९५.२२ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ८ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. आठ  हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा २.२९  टक्के इतका अधिक आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग