शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

By मेहरून नाकाडे | Updated: May 25, 2023 14:26 IST

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९६.०१ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने  राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले  असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.२० टक्केने निकाल घसरला आहे.  राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे मंडळाचा ९३.३४ टक्के तर कोल्हापूर मंडळाचा ९३.२८ टक्के इतका निकाल लागला आहे. पुणे व कोल्हापूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक कमी निकाल मुंबई मंडळाचा असून ८८.१३ टक्के इतका लागला आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार २२ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १२ हजार ३२० मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.   मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.६० टक्के इतके आहे.  मंडळातून १३ हजार ६ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १२ हजार ६७० विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.४१ टक्के आहे.  मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण २.८१ टक्केने अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार १३४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती पैकी १७ हजार ६९ परीक्षेस बसले होते. त्यातील १६ हजार २५४ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९५.२२ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ८ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. आठ  हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा २.२९  टक्के इतका अधिक आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग