शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील ९३ हजार शेतकऱ्यांची ‘ई पीक’ वर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 13:36 IST

राज्य शासनातर्फे यावर्षी ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीकपेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे.

रत्नागिरी : ई पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा नोंदणी उपक्रम राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९३ हजार ७९६ शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲपवर नोंदणी केली आहे.

सातबारा उताऱ्यावर दरवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंदणी तलाठी, मंडल अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येते. राज्य शासनातर्फे यावर्षी ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीकपेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे. या ॲपव्दारे शेतकरी स्वत:च्या ॲण्ड्राईड मोबाइल फोनवरून स्वत: भरावी अशी सूचना केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही जिल्हाभरात करण्यात आली. शेतजमिनीचा गट, खातेनंबर, पिकांची माहिती, हंगामनिहाय पिके, पिकांची छायाचित्रे आदी तपशील शेतकऱ्यांनी ॲपमध्ये भरावयाच्या आहेत. मोहिमेच्या सुरुवातीला ग्रामीण भागात नेटवर्क समस्या, मोबाइल रेंज नसल्यामुळे ॲपवरील नोंदणीसाठी अडचण येत होत्या. अनेक शेतकऱ्यांकडे तर ॲण्ड्राईड मोबाइल नसल्याने ॲपवर माहिती नोंदविणे अशक्य झाले होते.

मात्र, या समस्येवर मात्र करताना, ग्रामीण भागातील युवकांनी शेतकऱ्यांना मदत केली. समस्या असलेल्या गावातून तर ॲपवरील नोंदणीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. एका मोबाइलवरून २० शेतकऱ्यांच्या सातबाराची नोंदणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक शेतकरी खातेदार आहेत, त्यापैकी ९३ हजार ७९६ शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात ॲपवर नोंदणी करून महसूल, कृषी विभागाला आवश्यक असलेली माहिती भरून दिली आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी ३१ पर्यंत मुदतवाढ

यावर्षी भात पीक खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यामुळे त्यांना भात खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान होणार असल्याने शासनाकडून पुन्हा दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वास्तविक ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यामध्ये सातबारासह शेतातील पिकाचा फोटो डाऊनलोड करणे आवश्यक आहे. मात्र भात काढणी ऑक्टोबरमध्येच काढण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी