शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

रत्नागिरीतील ९३ हजार शेतकऱ्यांची ‘ई पीक’ वर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 13:36 IST

राज्य शासनातर्फे यावर्षी ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीकपेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे.

रत्नागिरी : ई पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा नोंदणी उपक्रम राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९३ हजार ७९६ शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲपवर नोंदणी केली आहे.

सातबारा उताऱ्यावर दरवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंदणी तलाठी, मंडल अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येते. राज्य शासनातर्फे यावर्षी ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीकपेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे. या ॲपव्दारे शेतकरी स्वत:च्या ॲण्ड्राईड मोबाइल फोनवरून स्वत: भरावी अशी सूचना केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही जिल्हाभरात करण्यात आली. शेतजमिनीचा गट, खातेनंबर, पिकांची माहिती, हंगामनिहाय पिके, पिकांची छायाचित्रे आदी तपशील शेतकऱ्यांनी ॲपमध्ये भरावयाच्या आहेत. मोहिमेच्या सुरुवातीला ग्रामीण भागात नेटवर्क समस्या, मोबाइल रेंज नसल्यामुळे ॲपवरील नोंदणीसाठी अडचण येत होत्या. अनेक शेतकऱ्यांकडे तर ॲण्ड्राईड मोबाइल नसल्याने ॲपवर माहिती नोंदविणे अशक्य झाले होते.

मात्र, या समस्येवर मात्र करताना, ग्रामीण भागातील युवकांनी शेतकऱ्यांना मदत केली. समस्या असलेल्या गावातून तर ॲपवरील नोंदणीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. एका मोबाइलवरून २० शेतकऱ्यांच्या सातबाराची नोंदणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक शेतकरी खातेदार आहेत, त्यापैकी ९३ हजार ७९६ शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात ॲपवर नोंदणी करून महसूल, कृषी विभागाला आवश्यक असलेली माहिती भरून दिली आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी ३१ पर्यंत मुदतवाढ

यावर्षी भात पीक खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यामुळे त्यांना भात खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान होणार असल्याने शासनाकडून पुन्हा दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वास्तविक ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यामध्ये सातबारासह शेतातील पिकाचा फोटो डाऊनलोड करणे आवश्यक आहे. मात्र भात काढणी ऑक्टोबरमध्येच काढण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी