शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवार्ता! जिल्ह्यातील ९,१४७ कष्टकरी होणार घरठाणातील जमिनीचे मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 13:11 IST

पिढ्यानपिढ्या घरठाणांमध्ये वसाहती करून राहणाऱ्या कष्टकरी लोकांना अखेर त्यांचे वास्तव्य असलेल्या घराची मालकी हक्क मिळणार आहे.

शोभना कांबळे

रत्नागिरी : पिढ्यानपिढ्या घरठाणांमध्ये वसाहती करून राहणाऱ्या जिल्ह्यातील ९१४७ कष्टकरी लोकांना अखेर त्यांचे वास्तव्य असलेल्या घराची मालकी हक्क मिळणार आहे. शासनाकडून अंतिम तारीख निश्चित झाल्यानंतर घराच्या जमिनीची मालकी या लोकांना दिली जाणार आहे. यात शेतकरी, कारागीर, कातकरी या कष्टकऱ्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये जमीन कसणाऱ्या कुळांप्रमाणे घरठाणांमध्ये अनेक पिढ्या कष्ट करून राहणारा कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, त्याची नोंद शासनदरबारी कुठेच नाही. रत्नागिरी जिल्ह्यात ६० हजारांपेक्षा अधिक संख्येने हे कष्टकरी लोक अशा घरठाणांमध्ये राहत आहेत. घरापुरती १ ते अडीच गुंठे जमिनीवर या कष्टकऱ्यांची घरे वर्षानुवर्षे वसलेली आहेत.

मात्र, त्यांची नोंद सातबारावर नसल्याने या घराची दुरूस्ती किंवा नवीन घर बांधावयाचे असेल तरीही त्यासाठी जमीन मालकाची परवानगी घ्यावी लागते.

घरठाणांमध्ये रहाणाऱ्यांकडून घरपट्टी तसेच दस्त वेळेवर वसूल केला जातो. मध्यंतरी शासनाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी त्यांची येणी जमा करूनही घेतली आहे. त्याची पावतीही देण्यात आली आहे. या घराबाबत या कष्टकऱ्यांना योग्य ते सुरक्षिततेचे अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळे ही घरे विकण्याचा जमीन मालकाला ही हक्क नाही.

मात्र, त्यांची मालकी या लोकांना देऊन त्यांची नावे सातबारावर येण्यासाठी शासनाकडून कोणताच कायदा झालेला नसल्याने कित्येक वर्षापासून घरठाण्यांमध्ये राहणारे हे कष्टकरी लोक आपले घर मालकीचे कधी होईल, या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे होते.

अखेर शासनाने या कष्टकऱ्यांची दखल घेत २०१७ ला या कष्टकऱ्यांच्या सर्वेक्षणाचे अभियान सुरू केले होते. २०१८ साली ते पूर्ण झाले. यात अर्ज केलेल्या ९६०७ कष्टकऱ्यांमधून ९१४७ पात्र ठरले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष हा निर्णय अद्याप लागू करण्यात आलेला नसल्याने हे कष्टकरी आपल्या घर जमिनीच्या मालकीची प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHomeसुंदर गृहनियोजन