शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

हातखंबा येथे ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, वेंगुर्ल्याचे दाेघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 19:17 IST

रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते.

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथून रत्नागिरी तालुक्यात गावठी बाॅम्ब विक्रीसाठी आलेल्या दोघांना जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - गाेवा महामार्गावरील हातखंबा येथे केली.

याप्रकरणी पोलीस हेडकाॅन्स्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार वेंगुर्ले येथील रामा सुरेश पालयेकर (वय २२), श्रीकृष्ण केशव हळदणकर (वय २६, रा. गावडेश्वर मंदिर) या दाेघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

वेंगुर्ले येथून दोन तरुण गावठी बाॅम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ६ वाजल्यापासून पोलिसांनी हातखंबा येथे सापळा लावला होता. सायंकाळी पालीहून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी (एमएच ०७, एपी-२७००) भरधाव वेगाने येत होती. ही दुचाकी पाेलिसांनी थांबविली. मात्र, रामा पालयेकर व श्रीकृष्ण हळदणकर हे दाेघे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यात नऊ जिवंत गावठी बाॅम्ब आढळले.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बाॅम्बशोधक नाशक पथकाला बाेलावून जिवंत बाॅम्ब त्यांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचानामा केला. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विक्रीचा डाव उधळला

वेंगुर्ला येथून जिवंत गावठी बाॅम्ब घेऊन आलेले तरुण रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते. बाॅम्बची विक्री हाेण्याआधीच पोलिसांच्या पथकाने त्यांचा डाव उधळून लावला.

टोळीच्या मुळापर्यंत जाणार का?

रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गावठी बाॅम्ब जिल्ह्याबाहेरून पुरविले जात असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस या टोळीच्या मुळापर्यंत जाणार का? रत्नागिरी तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार रोखणार का? हेच पाहायचे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी