शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

हातखंबा येथे ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, वेंगुर्ल्याचे दाेघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 19:17 IST

रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते.

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथून रत्नागिरी तालुक्यात गावठी बाॅम्ब विक्रीसाठी आलेल्या दोघांना जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - गाेवा महामार्गावरील हातखंबा येथे केली.

याप्रकरणी पोलीस हेडकाॅन्स्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार वेंगुर्ले येथील रामा सुरेश पालयेकर (वय २२), श्रीकृष्ण केशव हळदणकर (वय २६, रा. गावडेश्वर मंदिर) या दाेघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

वेंगुर्ले येथून दोन तरुण गावठी बाॅम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ६ वाजल्यापासून पोलिसांनी हातखंबा येथे सापळा लावला होता. सायंकाळी पालीहून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी (एमएच ०७, एपी-२७००) भरधाव वेगाने येत होती. ही दुचाकी पाेलिसांनी थांबविली. मात्र, रामा पालयेकर व श्रीकृष्ण हळदणकर हे दाेघे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यात नऊ जिवंत गावठी बाॅम्ब आढळले.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बाॅम्बशोधक नाशक पथकाला बाेलावून जिवंत बाॅम्ब त्यांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचानामा केला. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विक्रीचा डाव उधळला

वेंगुर्ला येथून जिवंत गावठी बाॅम्ब घेऊन आलेले तरुण रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते. बाॅम्बची विक्री हाेण्याआधीच पोलिसांच्या पथकाने त्यांचा डाव उधळून लावला.

टोळीच्या मुळापर्यंत जाणार का?

रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गावठी बाॅम्ब जिल्ह्याबाहेरून पुरविले जात असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस या टोळीच्या मुळापर्यंत जाणार का? रत्नागिरी तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार रोखणार का? हेच पाहायचे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी