शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

८६० कोटींचा आराखडा, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीने केली निधीमध्ये घसघशीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:48 IST

रत्नागिरी : अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक याेजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ काेटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला जिल्हा नियाेजन समितीच्या ...

रत्नागिरी : अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक याेजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ काेटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. गतवेळच्या आराखड्यापेक्षा यावर्षी ५०० काेटींची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. सन २०२४-२५ चा आराखडा ३६० काेटींचा हाेता.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा नियाेजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, मागील वर्षी जिल्ह्याच्या तरतूदीमध्ये भरीव वाढ झालेली आहे. यावर्षीही ती होईल, असे सांगितले. ८६० कोटींचा आराखडा बनविण्यात आला असून, राज्य नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबत निश्चितपणाने मागणी केली जाईल, असेही ते म्हणाले.खासदार राणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत यश मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वकष अर्थसंकल्प सादर करुन देशाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आणल्याबद्दल पंतप्रधान, अर्थमंत्री आणि सहकारी मंत्र्याचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो, असे सांगितले.जिल्हाधिकारी सिंह यांनी संगणकीय सादरीकरण केले. सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी आभार मानले.

अभिनंदनाचा ठरावविधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या शासनाचे, पालकमंत्री उदय सामंत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या प्रस्तावाला खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिला. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के निधी खर्च केला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPlanning Commissionनियोजन आयोगguardian ministerपालक मंत्रीUday Samantउदय सामंत