शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

जिल्ह्यासाठी ८४ कोटी ७१ लाखांचा परतावा, प्रथमच भरघोस परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:54 IST

महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८,५६९ शेतकऱ्यांनी १७ हजार १४ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८४ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांचा परतावा जाहीर झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा झाली आहे.

ठळक मुद्देफळपीक विमा योजनेअंतर्गत दिलासा, शेतकरी समाधानीकेंद्राच्या हिश्शामुळे परताव्याला उशीर

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८,५६९ शेतकऱ्यांनी १७ हजार १४ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८४ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांचा परतावा जाहीर झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा झाली आहे.हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र शासनाने हिश्शाची रक्कम न भरल्यानेच परतावा अद्याप रखडला होता. परंतु यावर्षी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भरघोस परतावा शासनाने जाहीर केला आहे.

स्वयंचलित हवामान केंद्राच्या अहवालानुसार शेतकरी लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, परतावा जाहीर झाल्याने विमा कंपनीकडून खातेदारांची बँकनिहाय यादी जाहीर करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक परताव्याची रक्कम जमा करण्यास प्रारंभ झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील १८,१९८ आंबा बागायतदारांनी १४,७५५ हेक्टरसाठी ८ कोटी ९२ लाख रुपये प्रीमियम भरला होता. सर्वच्या सर्व आंबा बागायतदारांना परतावा प्राप्त झाला असून, परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

१८,१५८ आंबा बागायतदारांच्या खात्यात ८४ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील २,७४० काजू बागायतदारांनी २,२५९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता. त्यासाठी ९६ लाख चार हजार प्रीमियम भरला होता. त्यातील केवळ ३७१ शेतकऱ्यांना ३८ लाख २२ हजार परतावा जाहीर झाला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना मात्र परतावा कमी प्राप्त झाला आहे.गतवर्षी जानेवारीअखेरीस तापमानात मोठी घट झाली होती. मे महिन्यात अवेळी पाऊस झाला होता. मार्च महिन्यातही तापमानात वाढ झाली होती. परिणामी वातावरणातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. शिवाय कोरोनामुळे आंबा विक्रीवरही परिणाम झाला होता. यंदा शेतकऱ्यांना पहिल्यांदाच भरघोस परतावा प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.गतवर्षी ऑगस्टमध्ये फळपीक विमा योजनेचा परतावा जाहीर झाला होता. यावर्षी सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना परताव्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. काजू उत्पादकांमध्ये नाराजी असून, आंबा उत्पादकांना मात्र परताव्याने तारले आहे. सन २०१७ - १८मध्ये जिल्ह्यातील १४,२७८ शेतकऱ्यांना ५५ कोटी १२ लाख ६३ हजार ७०४ रुपयांचा परतावा देण्यात आला.

त्यानंतर यावर्षी ८४ कोटी ७१ लाख २२ हजारांचा परतावा जाहीर झाला आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी