शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

रत्नागिरीत ७२ लाखांचा ऑक्सिजन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 11:42 IST

oxygen project, Ratnagirinews, udaysamant, minister ऑक्सिजनची निकड केवळ कोरोना रुग्णांसाठीच भासते असे नाही तर इतर गंभीर रुग्णांनाही त्याची गरज असते. त्यादृष्टीने रत्नागिरीत ७२ लाखांचा खर्च असलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरत्नागिरीत ७२ लाखांचा ऑक्सिजन प्रकल्पसिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लाझ्मा सेंटर उभारणार

रत्नागिरी : ऑक्सिजनची निकड केवळ कोरोना रुग्णांसाठीच भासते असे नाही तर इतर गंभीर रुग्णांनाही त्याची गरज असते. त्यादृष्टीने रत्नागिरीत ७२ लाखांचा खर्च असलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्गात हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प रत्नागिरीतही सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. हा प्रकल्प झाल्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा रत्नागिरीतून करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजनच्या एका वेळी २८ बाटल्या तयार होणार असल्याची माहितीही यावेळी सामंत यांनी दिली.त्याचप्रमाणे रत्नागिरीत खासगी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू झाली आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयात हे सेंटर सुरू होणे गरजेचे होते. त्यामुळे यासाठीही प्रयत्न सुरू होते. त्यासाठी आता सरकारकडून योग्य ती मशिनरी प्राप्त झाली असून, हे सेंटरही येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आजच ऑनलाईन परवानगी घेण्यात आली आहे. रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटते आहे. मात्र, रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यांमध्ये ही संख्या अधिक आहे, त्याचे कारण म्हणजे मास्कचा वापर काही व्यक्ती करत नाहीत. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवर महसूल विभागाबरोबरच आता पोलीस विभागाकडूनही कडक कारवाई करण्याची मोहीम सुरू झाली असल्याचे सामंत यांनी सांगितले. रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आयुष केंद्र सिंधुदुर्गात असल्यास परवानगीसध्या आयुष केंद्र दुसरीकडे हलविण्यावरून चर्चा सुरू आहे. याबाबत सामंत म्हणाले की, मंजूर असलेला प्रकल्प दुसरीकडे नेणे योग्य नाही. याबाबत आपण आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी बोललो असता त्यांनी हे केंद्र सिंधुदुर्गात होणार असेल तरच आपण परवानगी देऊ, अन्यथा नाही, असे स्पष्ट केल्याचे सामंत यांनी सांगितले.

हाथरसप्रकरणी शिवसेनेची भूमिका संजय राऊत यांनी ठामपणे मांडली आहे. मात्र, या घटनेत मीडियाला धन्यवाद द्यायला हवेत. २२ दिवस तिथे काय चालले आहे, हे मीडियाने निर्भिडपणे दाखविले. त्यामुळे भाजपचे खरे रूप समोर आले आहे.- उदय सामंत

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी