शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:46 IST

साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे

रहिम दलालरत्नागिरी : ग्रामीण भागातील दळणवळणात महत्त्वाची भूमिका असलेल्या साकवांची स्थिती दयनीय झाली आहे. जिल्ह्यात १९१ साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून त्या साकवांवरून प्रवास करावा लागत आहे. या साकवांची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि नवीन साकवांसाठी ५६ कोटी २९ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावर ग्रामस्थांच्या सोयीसाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे साकव मोडकळीस आल्याने जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ त्यावरून ये-जा करतात. या साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच काही गावांमध्ये नवीन साकवांची आवश्यकता आहे.  जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम विभागाने ८७ साकवांसाठी २४ कोटी रुपये तर चिपळूण बांधकाम विभागाने १०४ साकवांसाठी ३२ कोटी २९ लाख रुपये अशा एकूण ५६ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे. यंदाचा पावसाळा भीतीच्या छायेत गेला. किमान पुढच्या पावसाळ्यासाठी तरी आतापासूनच त्याची तरतूद करण्याची अपेक्षा केली जात आहे.

संपर्काचे एकमेव माध्यमजिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे, वाड्या, वस्त्यांमधील नदी, नाले, ओढ्यांवर बांधलेले साकव हाच एकमेव संपर्काचे माध्यम आहे. त्यामुळे पावसाळ्यात या साकवांना खूपच महत्त्व येते. नादुरुस्त झालेल्या धोकादायक असलेल्या साकवांमुळे अनेक वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे ये-जा करताना हाल होतात. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या साकवांसाठी जिल्हा नियोजन समितीने जास्तीत जास्त निधी मंजूर करून तो वेळीच देणे आवश्यक आहे.

अशी आहे निधीची गरजरत्नागिरी विभाग - ८७ साकव,आवश्यक निधी- २४ कोटी,चिपळूण विभाग - १०४ साकव,आवश्यक निधी - ३२ कोटी २९ लाख

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी