शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:46 IST

साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे

रहिम दलालरत्नागिरी : ग्रामीण भागातील दळणवळणात महत्त्वाची भूमिका असलेल्या साकवांची स्थिती दयनीय झाली आहे. जिल्ह्यात १९१ साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून त्या साकवांवरून प्रवास करावा लागत आहे. या साकवांची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि नवीन साकवांसाठी ५६ कोटी २९ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावर ग्रामस्थांच्या सोयीसाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे साकव मोडकळीस आल्याने जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ त्यावरून ये-जा करतात. या साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच काही गावांमध्ये नवीन साकवांची आवश्यकता आहे.  जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम विभागाने ८७ साकवांसाठी २४ कोटी रुपये तर चिपळूण बांधकाम विभागाने १०४ साकवांसाठी ३२ कोटी २९ लाख रुपये अशा एकूण ५६ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे. यंदाचा पावसाळा भीतीच्या छायेत गेला. किमान पुढच्या पावसाळ्यासाठी तरी आतापासूनच त्याची तरतूद करण्याची अपेक्षा केली जात आहे.

संपर्काचे एकमेव माध्यमजिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे, वाड्या, वस्त्यांमधील नदी, नाले, ओढ्यांवर बांधलेले साकव हाच एकमेव संपर्काचे माध्यम आहे. त्यामुळे पावसाळ्यात या साकवांना खूपच महत्त्व येते. नादुरुस्त झालेल्या धोकादायक असलेल्या साकवांमुळे अनेक वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे ये-जा करताना हाल होतात. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या साकवांसाठी जिल्हा नियोजन समितीने जास्तीत जास्त निधी मंजूर करून तो वेळीच देणे आवश्यक आहे.

अशी आहे निधीची गरजरत्नागिरी विभाग - ८७ साकव,आवश्यक निधी- २४ कोटी,चिपळूण विभाग - १०४ साकव,आवश्यक निधी - ३२ कोटी २९ लाख

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी