शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ५५ शाळांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:29 AM

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या ५५ प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचे २ कोटी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या ५५ प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचे २ कोटी २० लाख ९१ हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात २२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने चिपळूण, खेड तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला होता. त्याचबरोबर संगमेश्वर, लांजा राजापूर आणि दापोली येथील नद्यांनाही छोटे-मोठे पूर आल्याने नुकसान झाले. चिपळूण, खेडमध्ये आजही नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरुच आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.

जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, खेड, चिपळूण आणि दापोली या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अतिवृष्टीमुळे ५५ प्राथमिक शाळांच्या ८८ वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या तालुक्यात सुमारे १ कोटी ८१ लाख रुपये नुकसान आहे. नुकसानग्रस्त शाळांमध्ये काही शाळांची पूर्णत: पडझड झालेली असून, काहींच्या वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे.

---------------------------

गेल्यावर्षी निसर्ग वादळाने अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचे सुमारे ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, या नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी केवळ सव्वा कोटी रुपये निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यामुळे पुरेसा निधी न मिळाल्याने अजूनही अनेक नादुरुस्त शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

---------------------------------

तालुका नुकसानग्रस्त शाळा अंदाजे नुकसान लाखात

राजापूर ८ १४.००

संगमेश्वर १७ ११.३२

खेड ४ ३.१७

लांजा ४ २.७५

दापोली २ ८.४७

चिपळूण २० १८१.२०

एकूण ५५ २२०.९१