शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’चे तब्बल ५३ कोटी रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:04 IST

कामांची बिले भागावायची कशी ?, योजनांची कामे होण्यास आणखी कालावधी लागणार

रत्नागिरी : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांचे ५३ कोटी रुपये देणे शिल्लक आहे. कामाचे ७५ कोटी देणे असताना केवळ २२ कोटींचा निधी शासनाकडून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आला आहे. मात्र, उर्वरीत ५३ काेटी रुपये शासनाकडून येणे शिल्लक असल्याने कामांची बिले भागावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे निधीच नसल्याने ५३ काेटींचा निधी रखडल्याचे सांगण्यात येत आहे.जलजीवन मिशन प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात १,४३२ पाणी पुरवठा योजनांपैकी सुमारे ४०० कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे १५० पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तर, ४३२ योजनांचे प्रस्ताव सुधारित करावे लागणार आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, योजनांची कामे होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.जलजीवनमधून पूर्ण झालेल्या कामांची बिले देण्यासाठी ७५ कोटी मिळावेत, अशी मागणी शासनाकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ११ कोटी असा एकूण २२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, या कामांचे देणे ७५ काेटींचे असल्याने उर्वरीत ५३ काेटी काेठून आणायचे, असा प्रश्न जिल्हा परिषदेला सतावत आहे. कामाची बिले अद्याप देण्यात आलेली नसल्याने अनेकजण बिलांसाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत.

गप्प करण्याचा प्रयत्नग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर मोठ्या प्रमाणात कामाची बिले देणे आहे. या बिलापैकी काही रक्कम देऊन ठेकेदारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आराखडा १,६०० काेटींवरजिल्ह्यात जलजीवन अंतर्गत १,४३२ योजना राबवण्यात येत आहेत. सुमारे १,१०० कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. परंतु, अनेक योजनांना जागेची अडचण येत असल्याने सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे हा आराखडा १,६०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकारfundsनिधी