शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’चे तब्बल ५३ कोटी रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:04 IST

कामांची बिले भागावायची कशी ?, योजनांची कामे होण्यास आणखी कालावधी लागणार

रत्नागिरी : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांचे ५३ कोटी रुपये देणे शिल्लक आहे. कामाचे ७५ कोटी देणे असताना केवळ २२ कोटींचा निधी शासनाकडून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आला आहे. मात्र, उर्वरीत ५३ काेटी रुपये शासनाकडून येणे शिल्लक असल्याने कामांची बिले भागावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे निधीच नसल्याने ५३ काेटींचा निधी रखडल्याचे सांगण्यात येत आहे.जलजीवन मिशन प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात १,४३२ पाणी पुरवठा योजनांपैकी सुमारे ४०० कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे १५० पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तर, ४३२ योजनांचे प्रस्ताव सुधारित करावे लागणार आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, योजनांची कामे होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.जलजीवनमधून पूर्ण झालेल्या कामांची बिले देण्यासाठी ७५ कोटी मिळावेत, अशी मागणी शासनाकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ११ कोटी असा एकूण २२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, या कामांचे देणे ७५ काेटींचे असल्याने उर्वरीत ५३ काेटी काेठून आणायचे, असा प्रश्न जिल्हा परिषदेला सतावत आहे. कामाची बिले अद्याप देण्यात आलेली नसल्याने अनेकजण बिलांसाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत.

गप्प करण्याचा प्रयत्नग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर मोठ्या प्रमाणात कामाची बिले देणे आहे. या बिलापैकी काही रक्कम देऊन ठेकेदारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आराखडा १,६०० काेटींवरजिल्ह्यात जलजीवन अंतर्गत १,४३२ योजना राबवण्यात येत आहेत. सुमारे १,१०० कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. परंतु, अनेक योजनांना जागेची अडचण येत असल्याने सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे हा आराखडा १,६०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकारfundsनिधी