शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
5
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
6
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
7
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
8
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
9
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
10
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
11
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
12
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
13
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
14
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
15
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
16
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
17
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
18
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
19
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
20
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरात एकाच वर्षात ५ बिबटे, २ गवे, एका सांबराचा मृत्यू, उपासमारीमुळे बिबट्यांच्या मृत्यूत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 18:52 IST

भूकबळीमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी संगमेश्वर तालुक्यातील सहा बिबटे मिळाले. चार बिबटे विहिरीत कोसळण्याचा प्रकार घडला.

सचिन मोहितेदेवरुख : भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडून तसेच उपासमारीमुळे बिबट्यांचा मृत्यू हाेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. मात्र, आता बिबट्यांबराेबरच अन्य वन्य प्राण्यांचाही मृत्यू हाेऊ लागला आहे. संगमेश्वर तालुक्यात एका वर्षात ५ बिबटे, १ सांबर व ५ गवारेडा यांचा मृत्यू झाल्याची माहिती देवरुखचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी दिली आहे. तालुक्यात बिबट्या व गवा रेडे यांचा मृत्यू हाेणे ही बाब चिंताजनक आहे.

संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील गाव व वाड्या या डोंगरांमध्ये वसलेल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. जंगले नष्ट होत असल्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीमध्ये येत आहेत. पाळीव मांजरे, श्वान, कोंबड्या, गाई, बैल यांच्यावर बिबट्या भरदिवसाही हल्ला चढवतात.लक्ष्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीमध्ये कोसळण्याचा प्रकारही घडला आहे. तसेच भूकबळीमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी संगमेश्वर तालुक्यातील सहा बिबटे मिळाले. चार बिबटे विहिरीत कोसळण्याचा प्रकार घडला. यातील ३ जणांचा मृत्यू झाला असून एका बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. जंगलात दोन बिबटे मृतावस्थेत सापडले आहेत. कळंबस्ते, पिरंदवणे, कनकाडी, देवधामापूर,मोर्डे, हरपुडे या ठिकाणी बिबटे मिळून आले आहेत.

गतवर्षी नारडुवे, अंबावली, पाचांबे या ठिकाणी गवारेडे विहिरीत पडण्याचे प्रकार घडले हाेते. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या गवारेड्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवदान दिले आहे. किरबेट येथे झुंजीमध्ये दोन गव्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोंडउमरे येथे कड्यावरून कोसळून एका सांबराचा मृत्यू झाला आहे.संगमेश्वर तालुक्यात वनपाल म्हणून तौफिक मुल्ला, वनरक्षक म्हणून नानू गावडे, राजाराम पाटील, आकाश कडूकर, अरुण माळी हे कार्यरत आहेत. ही टीम वन्य प्राण्यांचा मृत्यू न हाेण्याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.

जनावरांमुळे १४७ शेतकऱ्यांचे नुकसान

पाळीव व वन्य प्राण्यांकडून भात, काजू, आंबा, केळी आदी पिकांची नासधूस केली जाते. गतवर्षी १४७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यातील ५६ शेतकऱ्यांना ४ लाख ४५ हजार ८७५ इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. अजूनही ९१ शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी