शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ गावांतील ४,३७६ ग्राहक अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:42 IST

खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीत

रत्नागिरी : गेले चार दिवस जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारे, मुसळधार पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. जिल्ह्यातील १,१५३ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पैकी ११४२ गावातील वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, अद्याप ११ गावांतील ४,३७६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.जिल्ह्यातील १८ उपकेंद्रे बाधित झाली होती. मात्र, सर्व उपकेंद्रे पूर्ववत करण्यास यश आले आहे. उच्चदाब १०३ वाहिन्या बंद पडल्या होत्या त्यापैकी १०१ वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दाेन वाहिन्या मात्र अद्याप बंद आहेत. लघुदाब वाहिनीचे एकूण ११६ वीजखांब पडले होते, त्यापैकी ५७ खांब उभे करण्यात आले आहेत. तसेच उच्चदाब वाहिनीचे ६१ खांब पडले होते, त्यापैकी २२ खांब उभे केले आहेत. एकूण ५५७५ रोहित्रे ठप्प झाली होती.त्यापैकी ५,५२२ रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. एकूण बाधित ११५३ गावांपैकी ११४२ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, ३,३६,०९३ ग्राहकांपैकी ३,३१,७१७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे ३९ लाखांंचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. वीजपुरवठा लवकर सुरू करण्याकरिता महावितरणचे कर्मचारी व अधिकारी परिश्रम घेत आहेत.खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीतमंडणगड तालुक्यातील ३३ केव्ही केरील वाहिनीवर तुळशी गावात वीज पडल्यामुळे वाहिनी बंद पडली होती. एकूण ४३ इन्सुलिटर्स बदलावे लागले. तुळशी गाव, देव्हारे, बाणकोट या परिसरातील जंगलातून ही वाहिनी येत असल्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांनी अथक परिश्रमाने वाहिनीवरील वीज पुरवठा सुरळीत केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण