शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ गावांतील ४,३७६ ग्राहक अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:42 IST

खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीत

रत्नागिरी : गेले चार दिवस जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारे, मुसळधार पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. जिल्ह्यातील १,१५३ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पैकी ११४२ गावातील वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, अद्याप ११ गावांतील ४,३७६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.जिल्ह्यातील १८ उपकेंद्रे बाधित झाली होती. मात्र, सर्व उपकेंद्रे पूर्ववत करण्यास यश आले आहे. उच्चदाब १०३ वाहिन्या बंद पडल्या होत्या त्यापैकी १०१ वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दाेन वाहिन्या मात्र अद्याप बंद आहेत. लघुदाब वाहिनीचे एकूण ११६ वीजखांब पडले होते, त्यापैकी ५७ खांब उभे करण्यात आले आहेत. तसेच उच्चदाब वाहिनीचे ६१ खांब पडले होते, त्यापैकी २२ खांब उभे केले आहेत. एकूण ५५७५ रोहित्रे ठप्प झाली होती.त्यापैकी ५,५२२ रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. एकूण बाधित ११५३ गावांपैकी ११४२ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, ३,३६,०९३ ग्राहकांपैकी ३,३१,७१७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे ३९ लाखांंचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. वीजपुरवठा लवकर सुरू करण्याकरिता महावितरणचे कर्मचारी व अधिकारी परिश्रम घेत आहेत.खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीतमंडणगड तालुक्यातील ३३ केव्ही केरील वाहिनीवर तुळशी गावात वीज पडल्यामुळे वाहिनी बंद पडली होती. एकूण ४३ इन्सुलिटर्स बदलावे लागले. तुळशी गाव, देव्हारे, बाणकोट या परिसरातील जंगलातून ही वाहिनी येत असल्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांनी अथक परिश्रमाने वाहिनीवरील वीज पुरवठा सुरळीत केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण