शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची दांडी, गतवर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमी

By शोभना कांबळे | Updated: August 18, 2023 17:39 IST

उन्हाचा कडाका वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यात १९ जुलैपासून पडलेल्या मुसळधार पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली असली तरी आता पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा सरासरी घटू लागली आहे. सध्या पावसाच्या किरकोळ सरीच कोसळू लागल्या आहेत. मात्र, उन्हाचा कडाकाही वाढला आहे.पावसाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जोरदार सुरुवात करून नागरिकांना दिलासा दिला होता. या पंधरा दिवसांपैकी तीन चार दिवसात झालेल्या पावसाने दोन महिन्याची एकूण सरासरी ओलांडली तसेच गेल्या वर्षीची आकडेवारीही ओलांडली होती. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा गेल्या वर्षीपेक्षा पावसाची आकडेवारी कमी झाली आहे.गेल्या वर्षी १८ ऑगस्टपर्यंत २८०० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस जिल्ह्यात पडला होता. तर यंदा याच तारखेपर्यंत २४०० मिलीमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमीच झाला आहे. आता दिवसभरात एखादी सर पडते. मात्र, पुन्हा उन्हाला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस थांबताच आता उकाड्याला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस