शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची दांडी, गतवर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमी

By शोभना कांबळे | Updated: August 18, 2023 17:39 IST

उन्हाचा कडाका वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यात १९ जुलैपासून पडलेल्या मुसळधार पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली असली तरी आता पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा सरासरी घटू लागली आहे. सध्या पावसाच्या किरकोळ सरीच कोसळू लागल्या आहेत. मात्र, उन्हाचा कडाकाही वाढला आहे.पावसाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जोरदार सुरुवात करून नागरिकांना दिलासा दिला होता. या पंधरा दिवसांपैकी तीन चार दिवसात झालेल्या पावसाने दोन महिन्याची एकूण सरासरी ओलांडली तसेच गेल्या वर्षीची आकडेवारीही ओलांडली होती. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा गेल्या वर्षीपेक्षा पावसाची आकडेवारी कमी झाली आहे.गेल्या वर्षी १८ ऑगस्टपर्यंत २८०० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस जिल्ह्यात पडला होता. तर यंदा याच तारखेपर्यंत २४०० मिलीमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमीच झाला आहे. आता दिवसभरात एखादी सर पडते. मात्र, पुन्हा उन्हाला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस थांबताच आता उकाड्याला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस