शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची दांडी, गतवर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमी

By शोभना कांबळे | Updated: August 18, 2023 17:39 IST

उन्हाचा कडाका वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यात १९ जुलैपासून पडलेल्या मुसळधार पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली असली तरी आता पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा सरासरी घटू लागली आहे. सध्या पावसाच्या किरकोळ सरीच कोसळू लागल्या आहेत. मात्र, उन्हाचा कडाकाही वाढला आहे.पावसाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जोरदार सुरुवात करून नागरिकांना दिलासा दिला होता. या पंधरा दिवसांपैकी तीन चार दिवसात झालेल्या पावसाने दोन महिन्याची एकूण सरासरी ओलांडली तसेच गेल्या वर्षीची आकडेवारीही ओलांडली होती. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा गेल्या वर्षीपेक्षा पावसाची आकडेवारी कमी झाली आहे.गेल्या वर्षी १८ ऑगस्टपर्यंत २८०० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस जिल्ह्यात पडला होता. तर यंदा याच तारखेपर्यंत २४०० मिलीमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमीच झाला आहे. आता दिवसभरात एखादी सर पडते. मात्र, पुन्हा उन्हाला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस थांबताच आता उकाड्याला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस