शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रत्नागिरी जिल्ह्यातील ३,९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 05:22 IST

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पावणेदोन महिने उलटले तरी शासनआदेश न आल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ३९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत.

रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पावणेदोन महिने उलटले तरी शासनआदेश न आल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ३९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ३९७२ शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये संवर्ग १, २, ३, ४ यानुसार बदल्या होणार आहेत. यामध्ये २० शाळांचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे. संवर्ग १ व २ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना मागेल ती रिक्त असलेली शाळा देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय बदल्याही शिक्षण विभागाला कराव्या लागणार आहेत. दरम्यान, शिक्षण समितीमध्ये सुगम व दुर्गम यादीला मंजुरी मिळाल्याशिवाय शिक्षकांच्या बदल्या होऊ न देण्याचा ठरावही केला होता. हा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला होता.जिल्हा परिषदेने सुरूवातीला ९६७ दुर्गम शाळांची यादी तयार केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करून तसेच जिल्हा परिषद सदस्यांकडून मागवलेल्या माहितीवरून नवीन यादी तयार करण्यात आली. ही यादी १६४३ प्राथमिक शाळांची होती. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना नवीन सुगम व दुर्गम शाळांच्या यादीनुसार कराव्यात. जुन्या यादीनुसार करू नयेत.तसेच बदल्या केल्यास त्या कोणत्याही परिस्थिती होऊ न देण्याचा निर्णय शिक्षण समित सभेत घेतला होता. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांवरून होणाºया गोंधळामुळे ग्रामविकास विभागाने थेट राज्यस्तरावरून आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचे नवे स्वतंत्र धोरण दि. २७ फेब्रुवारी २०१७च्या परिपत्रकानुसार अंमलात आणले. चालू सत्रामध्ये या विभागाने ३१ मे, २०१८पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरवली.शासनाच्या या नव्या धोरणामुळे येत्या शैक्षणिक वर्षात अनेक शिक्षकांच्या शाळा बदललेल्या असणार, असे गृहीत धरून त्यादृष्टीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या बदल्यांची तयारी केली होती. मात्र, काही शिक्षक न्यायालयात गेल्याने ही बदल्यांची प्रक्रिया पुढे गेली. त्यातच शिक्षक मतदारसंघ निवडणूक, कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुक आचारसंहिता लागल्याने या बदल्या पुढे गेल्या.त्याचबरोबर शिक्षक संघटनांनीही या बदल्यांना विरोध केला होता. जिल्ह्यात किती शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे आहेत, याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. तरीही शिक्षक बदल्यांचे अजूनही आदेश न आल्याने या बदल्या रखडल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTransferबदली