शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कलकाम कंपनीकडून ठेवीदारांना ३१ लाखाचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:38 IST

Crime News, Ratnagiri, fraud, वादग्रस्त ठरलेल्या कलकाम मायनिंग अँड लॉजिस्टिक कंपनीचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. ठेवीदारांना कोणताही लाभ न देता तब्बल ३१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष दत्तात्रय भाटकर (वेळणेश्वर) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ठळक मुद्देमुंबईतील ४ संचालकांवर गुन्हा दाखलआमीष दाखवून ठेवीदारांकडून मोठमोठी गुंतवणूक

अडरे : वादग्रस्त ठरलेल्या कलकाम मायनिंग अँड लॉजिस्टिक कंपनीचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. ठेवीदारांना कोणताही लाभ न देता तब्बल ३१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष दत्तात्रय भाटकर (वेळणेश्वर) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण शहरात स्वामी कॉम्प्लेक्स येथे कलकाम मायनिंग अँड लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय होते. ठेवीदारांना वेगवेगळी आमिषे दाखवून या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले गेले होते. वेगवेगळ्या आमिषापोटी अनेकांनी येथे गुंतवणूक केली होती. त्यासाठी काही एजंटही नियुक्त करण्यात आले होते.संतोष दत्तात्रय भाटकर (वेळणेश्वर) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. दिनांक १ डिसेंबर २०१६ ते ३ नोव्हेंबर २०२० या काळात कंपनीने ठेवीदारांना कोणताही लाभ न देता तब्बल ३१ लाख ३९ हजार २०० रुपयांची फसवणूक केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कलकाम मायनिंग अँड लॉजिस्टिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विष्णू पांडुरंग दळवी (४७, ठाणे), डेव्हलपमेंट डायरेक्टर सुनील रघुनाथ वांद्रे (३९, नालासोपारा), यशवंत व्हिवा टाऊनशीप (वसई) आणि विजय चंद्रकांत सुपेकर (४६, नालासोपारा) यांच्याविरूद्ध कलम ४२०, ४०९, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील अधिक तपास करत आहेत.अनेकांकडून टोपीसेबी अथवा रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही परवानगी न घेता थेट आर्थिक गुंतवणूक करून घेणाऱ्या किंवा कृषी क्षेत्रात गुंतवणुकीचे आमीष दाखवणाऱ्या अनेक कंपन्यांनी रत्नागिरीकरांना याआधीही टोप्या घातल्या आहेत. तरीही अशा ठिकाणी गुंतवणूक होतच आहे.याआधीही तक्रार झाली होतीगुंतवणूक करून घेताना कंपनीने मोठमोठी आमीषे लोकांना दाखवली होती. मात्र ठेवींची मुदत संपल्यानंतर कंपनीने केलेल्या करारानुसार ठेवीदारांना कोणताही लाभ दिला गेला नाही, अशी तक्रार यापूर्वीही दाखल झाली होती. आता पुन्हा एकदा एक घोटाळा समोर आला आहे. यात आणखीही अनेक गुंतवणूकदार फसले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी