शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

Ratnagiri: जयगडमध्ये वायू गळती, ६९ विद्यार्थिनींना बाधा

By मनोज मुळ्ये | Updated: December 12, 2024 18:00 IST

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे अचानक एलपीजी वायूची गळती झाल्याने माध्यमिक विद्यामंदिरातील ६९ विद्यार्थिनींना बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली ...

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे अचानक एलपीजी वायूची गळती झाल्याने माध्यमिक विद्यामंदिरातील ६९ विद्यार्थिनींना बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत जयगड येथून सुमारे ६० विद्यार्थिनींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती.गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास जयगड परिसरात अचानक वायू पसरला . येथील माध्यमिक विद्यामंदिरातील शिक्षक तसेच मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ जवळच्याच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हात वर करून आमच्या कंपनीमध्ये अशी दुर्गंधी येत असलेला कोणताही गॅस अथवा वायू नसल्याचे सांगितले. त्यानंतर वाघोदे यांनी आपत्ती व्यवस्थापन तसेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

त्यावेळी काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत होता. आठ विद्यार्थ्यांना पाेटात मळमळ होऊन उलटीचा त्रास सुरू झाला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मुख्याध्यापक वाघोदे यांनी त्या मुलांना काही वेळातच तेथील रुग्णालयात नेले. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन ती ६० पर्यंत गेली. विद्यार्थ्यांवर उपचार करून काहींना घरी सोडण्यात आले. मात्र, दीड ते दोन तासांच्या अंतराने त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अस्वस्थता वाटू लागली. त्यामुळे जयगड परिसरात खळबळ उडाली . रुग्णालयासमोर परिसरातील हजारो लोकांचा जमाव जमला . दरम्यान, विद्यार्थ्यांची तब्येत अधिकच बिघडू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.जयगड परिसर आणि रत्नागिरीतील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मिळेल त्या वाहनाने अत्यवस्थ विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते येत असलेल्या वाहनातून विद्यार्थिनींना उचलून नेत होते. काहींना स्ट्रेचरवर तर काहींना खुर्चीमध्ये बसवून हलवत होते. त्यामध्ये पोलिस तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. एका विद्यार्थिनीला मासळीच्या चारचाकी टेम्पोतून उपचारासाठी आणले गेले.या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लगेचच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात आले. विद्यार्थी रुग्णालयात येण्याआधीच मोठा फौजफाटा मदतीसाठी व बंदोबस्तासाठी तैनात होता. दोन विद्यार्थिनींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात मोठी गर्दीरुग्णांचे शेकडो नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात जमा झाले होते. त्यांना पोलिस शांतता राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. त्याला नातेवाइकांकडून प्रतिसादही देण्यात येत होता. मात्र, जिंदल कंपनी बंद करा, अशा घोषणाही रुग्णांचे नातेवाईक देत होते.

जिंदल कंपनीचा नकारजयगड परिसरातील वायू गळतीबाबत आपला काहीही संबंध नसल्याचे प्रसिद्धी पत्रक जिंदल कंपनीने प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे जयगड परिसरात ही वायू गळती कुठून झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आज घरी पाठवणारमहसूल प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेतली. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे बराच काळ रुग्णालयातच होते. दरम्यान दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना शुक्रवारी घरी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल