शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात ३० वळणे होणार गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:44 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्देमिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू, वाहतुकीसाठी बनणार निर्धोक

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही महामार्गांच्या चौपदरीकरणामध्ये ही सर्व ३० धोकादायक वळणे गायब होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही महामार्ग वाहतुकीसाठी निर्धोक बनणार आहेत.

कोकणातील रस्ते हे डोंगर-दºयांमधून गेलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र उतार किवा तीव्र चढाचा रस्ता आहे. नागमोडी वळणेही अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरून तसेच मुंबई - गोवा महामार्गावरून विशेषत: रात्री व पहाटेच्या वेळी वळणांचा अंदाज न आल्याने  आजवर अनेक मोठे अपघात झाले. त्यामध्ये जीवित हानीबरोबरच अनेक जखमींना कायमचे अपंगत्वही आले आहे. गेल्या काही वर्षात मुंबई-गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा अर्थात डेड ट्रॅक म्हणून ओळखला जात होता. या महामार्गाचा सर्वाधिक वापर कोकणवासियांकडून सणांसाठी, उन्हाळी हंगामात गावी येण्यासाठी केला जातो. त्यामुळेच गेल्या दोन दशकांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. 

सन २०१३मध्ये युपीए सरकारच्या काळात या महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात आलेल्या भाजपाप्रणित मोदी सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कॉँक्रीटीकरणातून करण्याचा निर्णय घेतला व कामाला गती दिली. त्यानंतर आता अनेक वर्षे रखडलेल्या मिºया - रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

घाटमाथ्यावरून कोकणात येण्यासाठी कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग, तर मुंबईतून कोकणात येण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गाचा वापर होतो. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी घाट, भोस्ते घाट, महामार्गावरील कामथे, वेरळ, आंजणारी घाट व परिसरातील रस्ता हा वाहनचालकांसाठी अडचणीचा ठरत आला आहे. आतापर्यंत खेडमधील कशेडी घाटात वळसा घालून यावे लागत होते. आता चौपदरीकरणात कशेडी घाटात बोगदा खोदण्यात आल्याने काही किलोमीटर प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.

सध्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात आहे. मात्र, हे काम रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमध्ये रखडले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या दोन्ही महामार्गावरील धोकादायक वळणे, ठिंकाणे यांचे सर्वेक्षण केले. मिºया - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट येथील दख्खनचे वळण व नाणीज गावातील धोकादायक ठिकाणी बांधकाम विभागाने उपाययोजना केल्या आहेत. आता मुंबई - गोवा महामार्गावरील २८ ठिकाणीही उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

 

बांधकामकडून सर्वेक्षण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी अनेक धोकादायक वळणे असलेल्या ठिकाणी रस्ता सरळ करण्यासाठी रेखांकन करण्यात आले आहे. वळणे कमी ठेवण्याचा प्रयत्न चौपदरीकरणाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात याबाबतचे सर्वेक्षण रत्नागिरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. 

 

३० ठिकाणे धोकादायक

बांधकाम विभागाने महामार्गावरील अपघातप्रवण तथा धोकादायक वळणांचा सर्वे केला असता ३० ठिकाणे धोकादायक आढळून आली. त्यामध्ये उधळे, भोस्ते घाट, आवाशी गाव, चिपळूणचा पागनाका, कोंंडमळा, आगवे-सावर्डे गाव, तुरळ गाव, आरवली, वांद्री, आंबा घाट, निवळी घाट, हातखंबा गाव, पाली, नाणीज, वेरळ, लांजा बाजारपेठ, कुवे, ओणी, कोदवली, राजापूर शहर भाग यांचा समावेश आहे.

टॅग्स :highwayमहामार्गkonkanकोकण