शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

२५०० शिक्षकांच्या बदल्या : १० टक्के शिक्षिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:40 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील २५०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये १० टक्के शिक्षिकांची गैरसोय झाल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे़. त्याचबरोबर अनेक शिक्षिका नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे समजते़ या बदल्या करताना शासनाने शिक्षक संघटनांसमोर नमते न घेतल्याने शिक्षक हरले, शासन जिंकले, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उमटत आहे़.

ठळक मुद्दे२५०० शिक्षकांच्या बदल्या : १० टक्के शिक्षिकांची गैरसोयसंघटनांचा दबाव झुगारला बदल्यांचे बिगुल वाजले

रत्नागिरी : जिल्ह्यातील २५०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये १० टक्के शिक्षिकांची गैरसोय झाल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे़. त्याचबरोबर अनेक शिक्षिका नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे समजते़ या बदल्या करताना शासनाने शिक्षक संघटनांसमोर नमते न घेतल्याने शिक्षक हरले, शासन जिंकले, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उमटत आहे़.चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या चार टप्प्यात बदल्या करण्यात आल्या होत्या़ त्यामध्ये ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, अपंग, विधवा, परित्यक्ता, कुमारिका, गंभीर आजार असलेले, पती-पत्नी एकत्रिकरण, अवघड क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा जास्त असलेले शिक्षक तसेच १० वर्षे एकाच क्षेत्रात असलेल्या शिक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश होता़ मात्र, मागणी करुनही शाळा न मिळालेल्या शिक्षकांच्या यात बदल्या करण्यात आल्या़. काही शिक्षक नेत्यांची डोंगराळ भागातील शाळांमध्ये बदली झाल्याने त्यांच्यासमोर संघटनांचे काम करताना अडचणीचे ठरणार आहे़, तर गेली अनेक वर्षे दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना या बदल्यांचा दिलासाही मिळालेला आहे़ पाचव्या टप्प्यातील बदल्या करताना शासनाने शिक्षक संघटनांसमोर नमते न घेता बदल्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रच हादरुन गेले आहे़.

सुगम-दुर्गम यादीमध्ये घातलेला घोळ जैसे थे ठेवून शासनाने बदल्या केल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ यामध्ये बदल्या झालेल्या शिक्षकांना बदल्या हव्या होत्या़ मात्र, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याचा विचार करुनच शासनाने हा निर्णय घ्यावा, असेच म्हणणे शिक्षक संघटनांचे होते़ त्यासाठी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना शिक्षकांनी साकडे घातले होते़ शासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने शिक्षक बदल्या आचारसंहितेपूर्वीच करण्यात आल्या़. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या चालू शैक्षणिक वर्षात पाच टप्प्यात करण्यात आल्या़ या बदल्या करताना शासनाने सुगम-दुर्गमच्या यादीमध्ये शिक्षकांनी घेतलेल्या आक्षेपाप्रमाणे कोणतीही दुरुस्ती न करता जुन्या यादीप्रमाणेच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या़. शिक्षकांच्या मागणीप्रमाणे ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी लावलेली बैठकही रद्द करण्यात आली होती़ त्यामुळे बदल्या होणार हे निश्चित झाले होते़ त्याप्रमाणे आचारसंहिता लागण्यापूर्वी अचानकपणे ग्रामविकास विभागाने बदल्यांचा आदेश काढल्याने शिक्षण विभागाचीही धावपळ उडाली होती़. ज्या शिक्षकांना पाचव्या टप्प्यातील शाळा मिळालेल्या नाहीत, अशा शिक्षकांच्या रँडम राऊंडमध्ये बदल्या करण्यात आल्या. यामध्ये १० टक्के शिक्षिकांची गैरसोय झाली आहे़ त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यातील एका शिक्षकाची माचाळ या अतिदुर्गम भागातील शाळेमध्ये बदली झाली आहे़ शिक्षक नेते संतोष रावणंग, अजित कांबळे व अन्य शिक्षक नेत्यांची बदली झाली आहे़

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीRatnagiriरत्नागिरी