शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लोकसभा निवडणूकीसाठी रत्नागिरी विभागातून २२५ बसेस आरक्षित 

By मेहरून नाकाडे | Updated: April 27, 2024 17:23 IST

रत्नागिरी : लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी तसेच मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी दोन दिवसासाठी रत्नागिरी विभागातून ...

रत्नागिरी : लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी तसेच मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी दोन दिवसासाठी रत्नागिरी विभागातून २२५ एसटी बसेसचे आरक्षण करण्यात आले आहे. मतदानासाठी जाणाऱ्या पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत दि. ६ मे रोजी नेऊन सोडणे व दि. ७ मे रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी या बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये दि.७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून मतदानापूर्वी आवश्यक असलेली तयारी सुरू आहे. कर्मचारी-अधिकारी प्रशिक्षण, ईव्हीएमवर मतपत्रिका सिलिंग करणे, मतपत्रिका गावातून वाटण्याची कामे सुरू आहेत. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. स्टाँगरूममध्ये ईव्हीएम युनिट ठेवली असून त्याचेही वितरण करण्यात येणार आहे.मतदानापूर्वी प्रशासनाने बहुतांश तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी २२५ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली. मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी, ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी एसटी बसेसची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघ निहाय बसेसचे आरक्षण करण्यात आले असून दि. ६ व ७ रोजी उपलब्ध केल्या जाणार आहे. तत्पूर्वी कर्मचारी प्रशिक्षण सुरू असून त्यासाठीही मागणीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४