शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

रत्नागिरी जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायती टीबीमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:44 IST

लवकरच होणार सन्मान, क्षयरोग निर्मूलन उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

रहिम दलालरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी २१४ ग्रामपंचायती आता टीबीमुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने  देशाला टीबीमुक्त करण्याचे धोरण आखले असून, रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे.  त्यासाठी वार्षिक एक हजार लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३०  टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्या थुंकी नमुन्याची तपासणी करण्यात आली.  तसेच १०० टक्के निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेला असावा, असे विविध निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायती टीबीमुक्त म्हणून पात्र ठरल्या आहेत.

सुवर्ण प्रमाणपत्रटीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्य, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि सलग तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्ण  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

शासनाचा खासगी रुग्णालयांशी करारजिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये थुंकी तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर संशयित रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येते. तसेच काही खासगी रुग्णालयांशीही शासनाने करार केला आहे. त्यामध्ये मोफत एक्स-रे  काढण्यात येतात, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.

जिल्ह्यात शोधमोहिमेत आढळले ५१० क्षयरुग्णक्षयरुग्ण जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात  सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये  जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ३११ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ३ हजार ३५५ संशयित क्षयरुग्ण शोधण्यात आले. त्यांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली तसेच एक्स-रे  काढण्यात आले. त्यामध्ये ४२  क्षयरुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण ५१० क्षयरुग्ण आहेत.

क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणजे नक्की काय ?गावामधून क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यात  क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान हे अभियान आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये १ हजार लोकसंख्येच्या प्रमाणात १ क्षयरोग रुग्ण किंवा त्यापेक्षा कमी म्हणजेच अजिबात रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत