शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी दिला बारावीचा पहिला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:52 IST

बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.

ठळक मुद्देरत्नागिरीत बारावीच्या परीक्षेला शांततेत प्रारंभसर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी : बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.कोकण परीक्षा मंडळाने परीक्षेसाठी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्र व १२ परिरक्षक कार्यालये नियुक्त केली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन केले असून, बैठक क्रमांक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळीच गर्दी केली होती. पालक व विद्यार्थी सकाळी ९.३० वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पेन, पॅड, हॉलतिकीट, पट्टी इतक्याच शैक्षणिक साहित्यासह प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत आणलेली सॅक बॅग परीक्षा केंद्रापासून दूरवर ठेवण्यात आल्याने ढिगारा जमला होता.बारावी परीक्षेसाठी विज्ञान शाखेतून ३ हजार १३४ मुलगे, तर २ हजार ५२८ मुली, वाणिज्य शाखेतून ४ हजार ५०१ मुलगे, तर ४ हजार ७१५ मुली, कला शाखेतून ३ हजार ४५२ मुलगे, तर २ हजार ९३१ मुली, एमसीव्हीसी शाखेतून ३८० मुलगे, तर २४० मुली परीक्षेला बसली आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात अर्धा तास आधी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आल्यामुळे विद्यार्थीवर्ग वेळेवर उपस्थित होता. यावर्षीपासून केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकांकडे सीलबंद पेपरची पाकिटे परीक्षेपूर्वी दिली. प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या हस्ते फोडण्यात आले.

पेपर फुटी व कॉपीसारख्या गैरमार्गाना आळा घालण्यासाठी बोर्डाने यावर्षीपासून या नवीन पध्दतीचा आवलंब केला आहे. कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी बोर्डातर्फे १२ भरारी पथके तयार केली आहेत. मोबाईलसाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर पालकवर्ग पाल्यांना घेण्यासाठी हजर होता. केंद्र असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांच्या वेळापत्रकामध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाStudentविद्यार्थी