शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी दिला बारावीचा पहिला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:52 IST

बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.

ठळक मुद्देरत्नागिरीत बारावीच्या परीक्षेला शांततेत प्रारंभसर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी : बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.कोकण परीक्षा मंडळाने परीक्षेसाठी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्र व १२ परिरक्षक कार्यालये नियुक्त केली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन केले असून, बैठक क्रमांक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळीच गर्दी केली होती. पालक व विद्यार्थी सकाळी ९.३० वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पेन, पॅड, हॉलतिकीट, पट्टी इतक्याच शैक्षणिक साहित्यासह प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत आणलेली सॅक बॅग परीक्षा केंद्रापासून दूरवर ठेवण्यात आल्याने ढिगारा जमला होता.बारावी परीक्षेसाठी विज्ञान शाखेतून ३ हजार १३४ मुलगे, तर २ हजार ५२८ मुली, वाणिज्य शाखेतून ४ हजार ५०१ मुलगे, तर ४ हजार ७१५ मुली, कला शाखेतून ३ हजार ४५२ मुलगे, तर २ हजार ९३१ मुली, एमसीव्हीसी शाखेतून ३८० मुलगे, तर २४० मुली परीक्षेला बसली आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात अर्धा तास आधी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आल्यामुळे विद्यार्थीवर्ग वेळेवर उपस्थित होता. यावर्षीपासून केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकांकडे सीलबंद पेपरची पाकिटे परीक्षेपूर्वी दिली. प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या हस्ते फोडण्यात आले.

पेपर फुटी व कॉपीसारख्या गैरमार्गाना आळा घालण्यासाठी बोर्डाने यावर्षीपासून या नवीन पध्दतीचा आवलंब केला आहे. कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी बोर्डातर्फे १२ भरारी पथके तयार केली आहेत. मोबाईलसाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर पालकवर्ग पाल्यांना घेण्यासाठी हजर होता. केंद्र असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांच्या वेळापत्रकामध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाStudentविद्यार्थी