शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत कागदावर २० टक्के तर प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 18:48 IST

रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत.

 रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. २० टक्क्यांची कपात ५० टक्क्यांवर कशी गेली, याबाबत सोमवारी आमदार उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या येथील अधिकाºयांना धारेवर धरले. तसेच कपातीइतकेच पाणी कमी असेल. त्यापेक्षा पाणीकपात चालणार नाही, असा इशाराही अधिकाºयांना यावेळी देण्यात आला. 

एमआयडीसी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा करीत आहे. यावेळी हरचेरी धरणात पाण्याची उपलब्धता असल्याचे पुढे येत आहे. याठिकाणी फारशी पाणीपातळी घसरलेली नाही. मात्र, असे असतानाही पाणीकपात का केली व कोणाच्या सांगण्यावरून केली, असा प्रश्नही आमदार सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना केला. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे सर्व संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांची बैठक सोमवारी दुपारी झाली. त्यावेळी सर्व ग्रामपंचायतींनी अपुºया पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली. यामुळे ग्रामस्थांना तोंड कसे द्यावे, असा सवालही केला. 

नगर परिषदेला पाणी द्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आल्याचे एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना सांगण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही वाढ झालेली नसताना ग्रामपंचायत पदाधिकाºयांना असे खोटे का सांगण्यात आले, असा प्रश्न करीत पुरेसा व दिलेल्या वेळेनुसार पाणी पुरवठा न झाल्यास शांत बसणार नाही, असेही सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना सुनावले. 

एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी, घाटिवळे,  या कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता १६.५० दशलक्ष घनमीटर आहे. एमआयडीसीकडून कुवारबावला ६००, कर्ला-२००/३००, नाचणे ३५०/७००, शिरगाव-४५०, मिºया २००, मिरजोळे-६०/७०, रत्नागिरी नगर परिषदेला १५०० घनमीटर पाणी गेल्या काही वर्षांपासून पुरवले जात आहे. त्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. 

धरणसाठ्यात मोठी घसरण असताना, केलेली पाणीकपात समजण्याजोगी आहे. परंतु, उन्हाळ्यात २० टक्के कपात सांगितल्यानंतर प्रत्यक्षात ५० टक्केपर्यंत पाणीकपात केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मार्च २०१८च्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे ६५ टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा होता. त्यामुळे एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी व घाटिवळे या धरणांमध्येही पाणीसाठा स्थिती नक्कीच चांगली आहे. मात्र, असे असतानाही एमआयडीसीने केलेल्या पाणीकपातीवरून वादळ निर्माण झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी