शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरीत कागदावर २० टक्के तर प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 18:48 IST

रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत.

 रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. २० टक्क्यांची कपात ५० टक्क्यांवर कशी गेली, याबाबत सोमवारी आमदार उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या येथील अधिकाºयांना धारेवर धरले. तसेच कपातीइतकेच पाणी कमी असेल. त्यापेक्षा पाणीकपात चालणार नाही, असा इशाराही अधिकाºयांना यावेळी देण्यात आला. 

एमआयडीसी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा करीत आहे. यावेळी हरचेरी धरणात पाण्याची उपलब्धता असल्याचे पुढे येत आहे. याठिकाणी फारशी पाणीपातळी घसरलेली नाही. मात्र, असे असतानाही पाणीकपात का केली व कोणाच्या सांगण्यावरून केली, असा प्रश्नही आमदार सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना केला. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे सर्व संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांची बैठक सोमवारी दुपारी झाली. त्यावेळी सर्व ग्रामपंचायतींनी अपुºया पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली. यामुळे ग्रामस्थांना तोंड कसे द्यावे, असा सवालही केला. 

नगर परिषदेला पाणी द्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आल्याचे एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना सांगण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही वाढ झालेली नसताना ग्रामपंचायत पदाधिकाºयांना असे खोटे का सांगण्यात आले, असा प्रश्न करीत पुरेसा व दिलेल्या वेळेनुसार पाणी पुरवठा न झाल्यास शांत बसणार नाही, असेही सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना सुनावले. 

एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी, घाटिवळे,  या कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता १६.५० दशलक्ष घनमीटर आहे. एमआयडीसीकडून कुवारबावला ६००, कर्ला-२००/३००, नाचणे ३५०/७००, शिरगाव-४५०, मिºया २००, मिरजोळे-६०/७०, रत्नागिरी नगर परिषदेला १५०० घनमीटर पाणी गेल्या काही वर्षांपासून पुरवले जात आहे. त्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. 

धरणसाठ्यात मोठी घसरण असताना, केलेली पाणीकपात समजण्याजोगी आहे. परंतु, उन्हाळ्यात २० टक्के कपात सांगितल्यानंतर प्रत्यक्षात ५० टक्केपर्यंत पाणीकपात केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मार्च २०१८च्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे ६५ टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा होता. त्यामुळे एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी व घाटिवळे या धरणांमध्येही पाणीसाठा स्थिती नक्कीच चांगली आहे. मात्र, असे असतानाही एमआयडीसीने केलेल्या पाणीकपातीवरून वादळ निर्माण झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी