शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

रत्नागिरीत कागदावर २० टक्के तर प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 18:48 IST

रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत.

 रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. २० टक्क्यांची कपात ५० टक्क्यांवर कशी गेली, याबाबत सोमवारी आमदार उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या येथील अधिकाºयांना धारेवर धरले. तसेच कपातीइतकेच पाणी कमी असेल. त्यापेक्षा पाणीकपात चालणार नाही, असा इशाराही अधिकाºयांना यावेळी देण्यात आला. 

एमआयडीसी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा करीत आहे. यावेळी हरचेरी धरणात पाण्याची उपलब्धता असल्याचे पुढे येत आहे. याठिकाणी फारशी पाणीपातळी घसरलेली नाही. मात्र, असे असतानाही पाणीकपात का केली व कोणाच्या सांगण्यावरून केली, असा प्रश्नही आमदार सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना केला. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे सर्व संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांची बैठक सोमवारी दुपारी झाली. त्यावेळी सर्व ग्रामपंचायतींनी अपुºया पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली. यामुळे ग्रामस्थांना तोंड कसे द्यावे, असा सवालही केला. 

नगर परिषदेला पाणी द्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आल्याचे एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना सांगण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही वाढ झालेली नसताना ग्रामपंचायत पदाधिकाºयांना असे खोटे का सांगण्यात आले, असा प्रश्न करीत पुरेसा व दिलेल्या वेळेनुसार पाणी पुरवठा न झाल्यास शांत बसणार नाही, असेही सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना सुनावले. 

एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी, घाटिवळे,  या कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता १६.५० दशलक्ष घनमीटर आहे. एमआयडीसीकडून कुवारबावला ६००, कर्ला-२००/३००, नाचणे ३५०/७००, शिरगाव-४५०, मिºया २००, मिरजोळे-६०/७०, रत्नागिरी नगर परिषदेला १५०० घनमीटर पाणी गेल्या काही वर्षांपासून पुरवले जात आहे. त्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. 

धरणसाठ्यात मोठी घसरण असताना, केलेली पाणीकपात समजण्याजोगी आहे. परंतु, उन्हाळ्यात २० टक्के कपात सांगितल्यानंतर प्रत्यक्षात ५० टक्केपर्यंत पाणीकपात केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मार्च २०१८च्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे ६५ टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा होता. त्यामुळे एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी व घाटिवळे या धरणांमध्येही पाणीसाठा स्थिती नक्कीच चांगली आहे. मात्र, असे असतानाही एमआयडीसीने केलेल्या पाणीकपातीवरून वादळ निर्माण झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी