शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:57 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातचिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश

रत्नागिरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई २००९ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकही मूल शालाबाह्य राहणार नाही, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग कार्यरत आहे. स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शालाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाले आहेत. जिल्ह्यात चिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश आहे. याशिवाय रस्त्याच्या कामासाठी देखील अन्य राज्यातील मंडळी येत असल्यामुळे शैक्षणिक प्रवाहात परराज्यातून आलेल्या कामगारांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी शिक्षण विभागाला यश आले आहे. सन २०१६-१७ मध्ये १५९, सन २०१७-१८ मध्ये ६६, तर सन २०१८-१९ मध्ये ७४ मुले शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाली आहेत.रत्नागिरीमध्ये १३३५ शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, स्वअध्ययनावर भर, कठीण विषयाची आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करणे, शाळा सुंदर, बोलक्या करणे, शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालाबाह्य मुलांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शालाबाह्य मुलांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करून त्यांचे युङ्कआयडी आधार काढण्यात यावेत, त्यांची उपस्थिती या माध्यमातून संनियंत्रित करण्यात यावी.या मुलांना वाचनङ्कलेखन व गणितातील मूलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्याचाच उपयोग करण्यात यावा. यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अधिक समृद्ध करावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, त्याची अमंलबजावणी सुरू आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीRatnagiriरत्नागिरी