शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:57 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातचिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश

रत्नागिरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई २००९ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकही मूल शालाबाह्य राहणार नाही, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग कार्यरत आहे. स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शालाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाले आहेत. जिल्ह्यात चिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश आहे. याशिवाय रस्त्याच्या कामासाठी देखील अन्य राज्यातील मंडळी येत असल्यामुळे शैक्षणिक प्रवाहात परराज्यातून आलेल्या कामगारांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी शिक्षण विभागाला यश आले आहे. सन २०१६-१७ मध्ये १५९, सन २०१७-१८ मध्ये ६६, तर सन २०१८-१९ मध्ये ७४ मुले शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाली आहेत.रत्नागिरीमध्ये १३३५ शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, स्वअध्ययनावर भर, कठीण विषयाची आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करणे, शाळा सुंदर, बोलक्या करणे, शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालाबाह्य मुलांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शालाबाह्य मुलांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करून त्यांचे युङ्कआयडी आधार काढण्यात यावेत, त्यांची उपस्थिती या माध्यमातून संनियंत्रित करण्यात यावी.या मुलांना वाचनङ्कलेखन व गणितातील मूलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्याचाच उपयोग करण्यात यावा. यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अधिक समृद्ध करावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, त्याची अमंलबजावणी सुरू आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीRatnagiriरत्नागिरी